रविवार, २४ जानेवारी, २०१०

महाराष्ट्राच्या मानबिंदुची अवस्था

काही दिवसांपुर्वी पुण्यनगरीला जाण्याचा योग आला. मित्र परिवारांना कचकचुन भेटता आल्यामुळे खुपच आनंद झाला होता. चितळ्यांची भाकरवडी, मनाली मधे जेवण यांनी पोट अगदी तृप्त झाले होते.

पण

या सर्वांनवर विरजण पडले ते महाराष्ट्राच्या मानबिंदुची म्हणजे शनिवारवाडयाची अवस्था बघुन. मन अगदी हेलावुन गेले. असे वाटत होते की आताच शनिवारवाड्यातुन बाहेर पडावे आणि ज्यांनी त्याची मानखंडना केली आहे त्यांचे डोके मेखसुन मारुन फोडावे.

ज्या शनिवारवाड्यात देशाचे राजकारण ठरायचे त्याची काय हि भयाण अवस्था? पानीपतचे स्वार ज्या दरवाजामधुन बाहेर पडले त्या दरवाजा मधुन आज वासनेचे प्रेमवीर आत घुसतात. ५-५ रुपयाची तिकिटे घेवुन आपण काय बघतो तर वासनेमधे आकंठ बुडालेल्या प्रेमविरांचे चाळे जे आपल्याला दिसतात पण ना शनिवारवाड्याच्या रखवालदारांना दिसत नाहीत ना स्वयंघोषीत संस्कृती रक्षाकांना.

आपल्या कडे इतिहासची कदरच केली जात नाही. पण त्याच वेळेला आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे जो स्वताचा इतिहास विसरला तो काय इतिहास घडवणार.

१९ व्या शतकात इंग्रजांनी शनिवारवाड्याचे लोकांच्या मनातील असलेले स्थान पुसण्यासाठी शनिवारवाडयाला आग लावुन दिली आणी ती आग चांगली १५ दिवस धुमसत ठेवु दिली. आज जी शनिवारवाड्याची भग्नअवस्था झाली आहे ती त्या आगीमुळे.

पण आपले सरकार सुद्दा काही करत नाही आहे. सरकारने मनात आणले तर तसाच्या तसा शनिवारवाडा उभा राहु शकतो पण सरकारला करायचे नाही आहे. शनिवारवाड्याचा विकास म्हणजे SRA ची योजना नाही ज्यात सरकारला मलिदा मिळेल त्या मुळे सरकार काही करणार नाही.

इतर देशातील जावुदे आपल्याच देशातील जयपुर मधील राजवाडे जसेच्या तसे राहु शकतात तर आपल्या महाराष्ट्रामधील औतिहासिक स्थाने योग्य प्रकारे का नाही राहु शकत. सरकारबरोबर आपली हि जबाबदारी आहे. आपल्या पुर्वजाचा अमुल्य ठेवा जपायची. ती सर्वांनी पार पाडलीच पाहीजे.

इतिहासप्रेमी यात लक्ष घालु शकतील का? माझ्या परिने जितके होवु शकेल तितकी मदत मी करेन. पण शनिवारवाडा वाचवा हो.

(या लेखा मधे फोटो डकवुन मला माझ्या मानबिंदुची अवेहलना करयाची नाही आहे त्यामुळे इथे फोटो देत नाही आहे.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा