मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

नासाची चांद्रमोहिम खरी कि खोटी?

माझे जुने ईमेल सर्च करताना नासाच्या चांद्रमोहिमेवर आक्षेप घेणारा ईमेल सापडला. जुन्या स्मृतींना पुन्हा उजाळा मिळाला.

नासाच्या चांद्रमोहिमेवर खुप वाद घालण्यात आला आहे. या जगात असाहि एक गट आहे जो मानतो कि हि चांद्रमोहिम खरी नसुन एके ठिकाणी फोटो काढले आहेत आणि लोकांची दिशाभुल करण्यात आली आहे. त्यातीलच काहि फोटो मी इथे डकवले आहेत. हे फोटो आणि त्याचे वर्णन पाहिले की काहितरी काळंबेर असल्याचा संशय नक्कीच मनात येतो.


चंद्रावर सुर्याचा एकच उर्जा स्त्रोत असताना, सावली एकाच लाईनमधे पडायला असायला हवी होती. पण इथे एकापेक्षा जास्त स्त्रोत असण्याची शक्यता आहे.
अवकाशवीराच्या डोक्यावर लाईट चमकताना दिसत आहे. पुन्हा एकदा हेच दिसुन येत आहे कि स्रुर्य एकच उर्जा स्त्रोत असताना आणखी लाईट असण्याची शक्यता आहे.

अवकाशात एकहि तारा दिसत नाहि? खुपच अजब गोष्ट आहे.

अवकाशवीरांच्या हेल्मेटवर पुन्हा एकदा उर्जेचा स्त्रोत दिसुन येत आहे. हा प्रकाश नक्किच सुर्याचा नाहि आहे तर फोटो काढण्यासाठी ठेवलेल्या लाईटचा आहे. जवळ असल्यामुळेच त्या लाईटच रिफ्लेकशन हेल्मेट मधे दिसत आहे.

अपोलो १५, १६, १७ हे मानवरहित यान चंद्रावर पाठवले होते मग त्यांचे फोटो चंद्रावर कोणी काढले?

LM इंजीन इतके पॉवरफुल होतं मग चंद्रावर उतरताना धुळ का नाहि उडाली?

पायाचा ठसा हाच सर्वात मोठा पुरावा आहे कि यान चंद्रावर उतरलेच नव्हते.
१. इंजीन भरपुर पॉवरफुल होतं मग उतरताना जी खुप मोठ् प्रमाणात धुळ उडाली असेल तेव्हा हा पायाचा ठसा त्या धुळीमधे उडुन का नाहि गेला?
२. चंद्रावर पाणी नाहि आहे. मग हा पायाचा ठसा ज्या मातीत उठला आहे त्या मातीला कोणी इतक्या घट्ट प्रमाणात आणी इतक्या व्यवस्थीत पकडुन ठेवले आहे.


चंद्रावर हवाच नसताना अमेरिकेचा झेंडा कसा हलत आहे?

२५० डिग्री तापमाना मधे जिथे फोटोची फिल्म जळुन खाक होईल अश्या चंद्राच्या वातावरणात फोटो काढलेच कसे गेले?

सोमवार, १६ ऑगस्ट, २०१०

काहि(च्या काहि) पुणेरी पाट्या

ई मेल द्वारा आलेल्या या पुणेरी पाट्या आहेत. खुप नविन वाटल्या म्हणुन ब्लॉगवर टाकल्या आहेत.














शनिवार, १४ ऑगस्ट, २०१०

हीच का लोकशाही?

लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही, ही लोकशाहीची व्याख्या. या लोकशाहीने लोकांच्या हातात मतदानाचा हक्क दिला आणि पुढे माहितीचा अधिकारही. मात्र मतदानाचा अधिकार बजावणारा विकत घेतला जातो आणि माहितीचा अधिकार वापरणारा एक तर सिस्टीमचा बळी ठरतो किंवा गुडांच्या हत्यारांचा. लोकशाहीच्या थोतांड गप्पा मारणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे बुरखे टराटरा फाडणारं लोकशाहीतलं हे वास्तव वारंवार समोर येतं राहिलंय. परंतु तरीही लोकशाहीच्या दारावर न्यायाची भीक मागणाऱ्यांची संख्या मात्र कधी कमी झाली नाही. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्यांपैकीच एक म्हणजे संजय परशुराम पाटील. गेल्या १० वर्षांंमध्ये न्यायासाठी सगळ्यांच्या दारावर जाऊन आले पण त्यांना कोणीही न्याय देऊ शकलेला नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील कालकुंद्री हे संजय पाटील यांच मूळ गाव. ते तिघं भाऊ. तिघंही कामाच्या निमित्ताने गावाबाहेर राहायचे. त्यांचे वडील सैन्यात होते. त्यामुळे ते कायम बाहेरच असायचे. निवृत्त झाल्यानंतर ते गावात आले. संजय पाटील यांच्या म्हणण्यानुसार, वडील गावात आल्यानंतर गावातील गावगुंडांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. कारण गावातील काही लोकांचा त्यांच्या जमिनीवर आणि घरावर डोळा होता. त्यांना ती जमीन हवी होती. ती विकावी म्हणून वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला जाऊ लागला, गावगुंडांकडून मारहाण केली जायची. या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसात रीतसर तक्रार दिली. मात्र पोलिसांकडून काहीही कारवाई केली जात नव्हती. पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे त्या गावगुंडांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत होती. त्यांच्याकडून होणारा त्रास सुरूच होता. त्यामुळे परशुराम पाटील यांनी जिल्हा सैनिक केंद्राकडे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांच्याकडेही दाद मागितली.
हे सर्व करीत असताना आता तरी आपली यातून सुटका होईल अशी त्यांना आशा होती, मात्र झालं ते अगदी उलट. वरिष्ठाकडे गेल्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी गावगुंडांवर कारवाई करण्याऐवजी परशुराम पाटील यांनाच त्रास द्यायला सुरुवात केली. चौकशीच्या नावाखाली त्यांना वारंवार पोलीस ठाण्यामध्ये बोलावलं जायचं, धमकावलं जायचं. दिवसभर बसवून घ्यायचं आणि थातूरमातूर कारण सांगून नंतर या, असं सांगितलं जायचं. शिवाय त्यांच्यावरच खोटय़ा तक्रारी दाखल केल्या जाऊ लागल्या. गावात गावगुंडांचा आणि बाहेर पोलिसांचा असा दुहेरी त्रास त्यांना सुरू झाला. २००१ पासून २००६ पर्यंत म्हणजे तब्बल पाच र्वष हे सर्व काही सुरू होतं. २००६ साली माहितीचा अधिकार आला आणि त्यांना पुन्हा एकदा न्यायाच्या आशेचा किरण दिसला. या कायद्याचा उपयोग करून तरी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटेल अशी त्यांना आशा होती. म्हणून त्यांनी या अधिकाराचं शस्त्र हाती घेतलं. त्यातून आजपर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाईची सगळी माहिती मागितली. मिळालेली माहिती म्हणजे पोलिसांनी केलेल्या अन्यायाची यादी होती. ही माहिती मागितल्यामुळे पोलीस अधिकच चिडले. पहिल्यांदा त्यांनी माहिती नाकारली पुढे ती देण्यास टाळाटाळ करणे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकून माहिती मागू नये यासाठी जे काही करणं शक्य होतं ते त्यांनी केलं. परंतु संजय पाटील या कुठल्याही दबावाला बळी पडले नाहीत.
दरम्यान, १ डिसेंबर २००९ रोजी सागर पाटील हा त्यांचा लहान भाऊ गावात गेला असता गावातील शिवाजी पाटील यांच्यासोबत त्याची बाचाबाची झाली. त्यामुळे शिवाजी पाटील यांनी ४ डिसेंबर २००९ रोजी सागर पाटील याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला कलम १५१ अंतर्गत तातडीने अटक केली आणि साध्या बाचाबाचीसाठी त्याला चार दिवस पोलीस कोठडीत डांबून ठेवण्यात आलं. या चार दिवसांमध्ये त्याला जबर मारहाण करण्यात आली. वास्तविक पाहता ४८ तासांच्या आत त्याला संबंधित न्यायाधीशांसमोर हजर करणे गरजेचे असताना त्याला तसे न करता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. म्हणजे सर्व कायदे धाब्यावर बसवून पोलिसांनी चार दिवस त्याचा छळ केला. शिवाय त्याला २५ हजार रुपयांचा जामीन बजावण्यात आला. (आरुषी हत्याकांडातील संशयित आरोपींना पंचवीस हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त केले होते.)
सागर पाटील याच्यावर याआधी कोणत्याही तक्रारी नसताना त्याला समज देऊन न सोडता २५ हजारांचे जामीनपत्र मागण्यात आले. शिवाय हे जामीनपत्र लिखित स्वरूपात न मागता तोंडंी घेण्यात आला. त्यानंतरही ५ आणि ६ डिसेंबर रोजी त्यांच्या वडिलांनी जामीन देण्याची तयारी दर्शविली होती मात्र त्यांचा जामीन स्वीकारला नाही. चार दिवसानंतर पोलिसांनी त्याला सोडलं. या चार दिवसात बदल्याच्या भावनेतून पोलिसांनी आजपर्यंतचा सगळा राग सागरच्या अंगावर काढला. त्याला अर्धमेला केला. त्यामुळे त्याला कुठलंही काम करता यायचं नाही. तो अनेक महिने अशाच अवस्थेत होता. त्या त्रासातून बाहेर पडणं त्याला शक्य झालं नाही अखेर २० मे २००९ रोजी त्याचा मृत्यू झाला.
न्यायासाठी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली होती. सागरच्या मृत्यूच्या धक्क्यातून सर्वजण सावरण्याचा प्रयत्न करीत होते मात्र वडील त्या धक्क्यातून स्वत:ला सावरू शकले नाहीत. आणि एक दिवस तेही गेले. अवघ्या काही महिन्यांमध्ये घरातली दोन माणसे गमावल्यानंतर संजय पाटील यांच्यावर खरं तर आभाळ कोसळलं. परंतु त्यांनी आपली लढाई अध्र्यावर सोडली नाही. ज्या माजी सैनिकाने देशासाठी लढाया लढल्या, सैन्य सेवा, रक्षा पदक, जीएस पदक मिळवलं त्या माजी सैनिकावर सरकारी भक्षकांनी केलेल्या अन्यायाविरोधात लढण्याची वेळ आली. मात्र अखेपर्यंत त्यांना न्याय मिळालाच नाही. आता न्याय मिळवून देणे हेच संजय पाटील यांच्या आयुष्याचं एकमेव लक्ष्य बनलं. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा माहितीच्या अधिकाराचं शस्त्र हाती घेतलं.
सागरचा गुन्हा अदखलपात्र असतानाही पोलिसांनी त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा प्रकार असो की त्याचा नाकारलेला जामीन असो या सगळ्यांमध्ये पोलीस ठाणे चंदगड, तत्त्कालिन तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी कायदे आणि नियम धाब्यावर बसविले होते. माहितीच्या अधिकारातून या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. त्यानंतर त्यांनी न्यायालयाचे दारही ठोठावले. परंतु तिथे न्याय मिळण्याआधीच सागरचा मृत्यू झाला. आपण केलेला अन्याय आपल्याला एक दिवस नक्की भोवणार याची कल्पना सरकारी यंत्रणांना आल्यामुळेच त्यांनी पुन्हा माहिती देण्यास टाळाटाळ करणे, धमकावणे, खोटी माहिती देणे असे प्रकार सुरू केले. मात्र याला न जुमानता ते पाठपुरावा करीत राहिले. कारण आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल ही त्यांना अपेक्षा होती. संघर्ष करून त्यांनी अखेर माहिती मिळविली. त्याच्या आधारावर त्यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. चौकशीचा फार्स सुरू झाला. आज वर्ष लोटलं तरी चौकशी संपत नाही. अन् त्यांना हवा असलेला न्याय मिळत नाही. या अन्यायाविरोधात त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून माहिती आयुक्तांपर्यंत सगळ्यांच्या दारावर न्यायाची भीक मागितली. परंतु या लोकशाहीत प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच आली. हे सर्व पाहता हीच का लोकशाही? असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र तरीही त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास अजून अबाधित आहे. या विश्वासावरच आपल्याला कुठेतरी नक्की न्याय मिळेल या आशेवर त्यांचा संघर्ष सुरू आहे. लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेल्या या राज्यात त्यांना न्याय मिळतोय का हेच पाहायचंय.
(हा लेख कालच्या लोकप्रभामधे छापुन आल आहे. लेखक - विलास बडे)

शनिवार, ७ ऑगस्ट, २०१०

अनवॉंटेड कॉल्स

"सर लोन घेणार का?"," क्रेडिट कार्ड पाहिजे का?" असे कॉल्स आपल्या सर्वांनाच येत असतात. आपण ज्यांच्याकडुन नेटवर्क घेतले आहे ते सर्विस प्रोव्हायडर काहि पैश्यांसाठी ग्राहकांचा डेटा या टेलेमार्केटिंग करणार्‍या कंपन्याना विकतात आपला नंबर डु नॉट डिस्टर्ब मधे नोंदवला असला तरी. हा अनुभव आपल्या सर्वांना आला आहे. पण काल प्रणव मुखर्जींना आल्या नंतर यात काहि बदल होइल हि अपेक्षा आहे.

पण हा या लेखाचा विषय नाहि आहे. खरे तर महागाईच्या मुद्दावर जो संसदेत गदारोळ चालु आहे त्यावर सहमती मिळवण्यासाठी जी मिटींग बोलवण्यात आली ती मिटिंग या अनवॉंटेड कॉल्समुळे पाण्यात गेली आहे. आलेल्या बातमीवरुन एकच दिसुन येतं की तो कॉल्स आल्यानंतर प्रत्येक पक्षातील हजर सभासद त्याला कसे कॉल्स येतात ते सांगत बसला. आणि एकदा चर्चेचा विषय बदलला की जे सर्व मिटींगचे काय होते तेच याचे
सुद्दा झाले असणार नाहितर काय निर्णय झाला हे लोकांना समजल असतं.

आधिच गेल्या काहि वर्षांपासुन संसद ते विधानसभाचे सर्वच राजकिय पक्षांनी आखाडे बनवले आहेत. आमच्या कररुपातुन मिळणार्‍या पैश्याचा विनियोग हे नालायक नेते फक्त स्वताचे खिसे भरण्यासाठी करतात वर कामकाज सुरळीत चालु रहावे म्हणुन बोलवलेल्या मिटिंगची पण वाट लावुन टाकतात.

हि बातमी वाचल्यावर मला काहि प्रश्न पडले ते म्हणजे -

१. साध्या कंपनीच्या मिटिंग मधे सुद्दा आपण मोबाईल घेवुन जात नाहि. पण देशाच्या आर्थिक नाड्या हातात असलेला माणुस मिटिंग मधे कसा मोबाईल घेवुन जातो.

२. दुसरा महत्वाचा प्रश्न असा की, इतकी महत्वाची मिटिंग चालु असताना देशाचा अर्थमंत्री अनोळखी नंबर वरुन आलेला फोन उचलतोच कसा? कि मिटिंग महत्त्वाची नव्हती?

याच वरुन समजुन येतं की आपल्या कररुपात जमा होणार्‍या पैश्याला हे माजोरडे नेते किती महत्व देतात?

जाता जाता - जुलैच्या भारतातील लाखो लोकांना एक दिवस उपाशी ठेवुन जो संप करण्यात आला त्यामुळे महागाई किती कमी झाली?

रविवार, १ ऑगस्ट, २०१०

टिळक आणि जीना : नुरानींच्या नजरेतून!

लोकमान्य टिळक आणि महमद अली जीना हे फक्त एकमेकांचे सहकारी वा स्वातंत्र्य चळवळीतील सहप्रवासी नव्हते, तर ‘कॉम्रेड्स इन आम्र्स’ होते; म्हणजेच सर्वार्थाने ‘भाई-भाई’ होते, हे काही अभ्यासकांना माहीत असले तरी त्याची फारशी चर्चा वा वाच्यता केली जात नाही. नि:पक्षपातीपणे सखोल संशोधन करून इतिहासलेखन करण्याबद्दल ख्याती असलेल्या ए. जी. (अब्दुल गफूर) नूरानी यांनी टिळक आणि जीना या दोघांच्या संबंधांवर लिहिलेला ‘जीना अ‍ॅण्ड टिळक- कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ हा ग्रंथ अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. या ग्रंथाने जीना व टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वावर, त्यांच्या राष्ट्रप्रेमावर, हिंदू-मुस्लीम ऐक्याबाबतच्या त्यांच्या भूमिकांवर नवा प्रकाश टाकला आहे. आज, १ ऑगस्ट रोजी टिळकांची ९० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने या वेगळ्या पुस्तकाबद्दल..
‘हिंदुस्थानच्या फाळणीचे खलनायक कोण?’ आणि ‘ही फाळणी टाळता आली असती का?’, या प्रश्नांवर शब्दश: हजारो पुस्तके, असंख्य निबंध-लेख, वृत्तपत्रीय स्तंभ लिहिले गेले आहेत. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील संवाद, चर्चा असो किंवा युद्ध, काश्मीरमधील ‘स्वातंत्र्यलढा’ असो अथवा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद, भारतातील हिंदू-मुस्लीम तणाव, दंगे वा तीव्र अपसमज या सर्वाचे मूळही फाळणीत आहे, असे बहुतेकांचे मत आहे.
फाळणी आणि स्वातंत्र्यानंतर आता साठ वर्षे होऊन गेली तरी फाळणीच्या अनुषंगाने निर्माण झालेले प्रश्न नीट उकलले गेलेले नाहीत. प्रत्येक दशकात दोन्ही देशांचा सुरक्षाव्यवस्थेचा खर्च वाढतच चालला आहे आणि अणुयुद्धाचा धोकाही टळलेला नाही.
बहुसंख्य भारतीयांच्या (आणि हिंदूंच्या) दृष्टिकोनातून महमद अली जीना हे फाळणीचे खलनायक; परंतु पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून ते त्यांच्या देशाचे महानायक कायदेआझम! काही ‘तटस्थ’ भाष्यकारांच्या दृष्टिकोनातून जीना हे भारतीय उपखंडातील प्रतिनायक! गांधीजींनाही आव्हान देऊ शकणारे आणि पंडित नेहरूंनाही ‘तुल्यबळ’ प्रतिस्पर्धी ठरू शकणारे!
गेल्या काही वर्षांत संघ परिवारातील (मुख्यत: भाजपमधील) बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांना महमद अली जीनांबद्दल विलक्षण आत्मीयता वाटू लागल्याने हिंदुत्ववाद्यांमध्येच खळबळ माजली आहे. लालकृष्ण अडवाणी आणि जसवंतसिंह या दोन दिग्गज भाजप पुढाऱ्यांनी जीनांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. जीना आधुनिक विचारांचे होते, उदारमतवादी होते, त्यांची जीवनशैली युरोपियन होती; इतकेच नव्हे तर ते विचारांनीही सेक्युलर होते, असेही प्रतिपादन केले गेले आहे. हिंदुत्ववादी परिवारातील हा ‘नवविचार’ बाजूला ठेवला तरी मुंबईतील आणि उर्वरित भारतातील अनेकांना जीनांचे आकर्षण वाटत आले आहे. हे जीना-प्रशंसक मुस्लीम जातीयवादी नाहीत (वा नव्हते), फाळणीचे समर्थक नाहीत आणि नेहरू-गांधींचे विरोधकही नाहीत.
अनेक व्यासंगी, साक्षेपी आणि चिकित्सक भाष्यकार व इतिहासकारांनी या ‘खलनायका’तील नायकाचा शोध घेतला आहे. किंबहुना नायकाच्या भूमिकेत राजकारण करू लागलेल्या या नेत्याचा एकदम खलनायक कसा झाला, याबद्दलही या विद्वानांनी अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण आणि जीनांचे मनोविश्लेषणही केले आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या तीन दशकांत जसे गांधीजी व नेहरू हे राजकीय क्षितिजावर तळपत होते, तसेच जीनाही आपले स्वयंभू व्यक्तिमत्त्व व आपला स्वतंत्र ठसा उमटवू लागले होते. जीनांची तीक्ष्ण बुद्धिमत्ता, त्यांचा नि:स्पृह वकिली बाणा, त्यांचे अमोघ वक्तृत्व, त्यांची भाषा आणि व्यक्तिमत्त्व यामुळे ते या पिढीतील स्वातंत्र्यलढय़ात आघाडीवर होते. राजकीय डावपेच, स्वाभिमान आणि लोकांचा (फक्त मुस्लीमच नव्हे, तर हिंदूंचासुद्धा!) पाठिंबा यामुळे ते लोकमान्य टिळकांपासून ते सरोजिनी नायडूंपर्यंत सर्वाना आपलेसे वाटत. त्यांच्या राष्ट्रप्रेमाविषयी (एकत्र हिंदुस्थान) आणि त्यांच्या जाज्ज्वल्य ब्रिटिश साम्राज्यविरोधाविषयी कुणालाही शंका नव्हती. फाळणीचा तर तेव्हा मुद्दाच नव्हता. आणि जीना हे तर हिंदू-मुस्लीम एकजुटीचे तेजस्वी प्रतीक होते, असे अनेक काँग्रेस नेत्यांचे त्यावेळी मत होते.
बहुसंख्य भारतीयांना जीना माहीत आहेत ते त्यांनी पाकिस्तानची मागणी केल्यापासून ते फाळणीपर्यंत! म्हणजे एकूण सात-आठ वर्षांचा काळ! फाळणीनंतर (स्वातंत्र्यानंतर) सहा महिन्यांच्या आतच गांधीजींची हत्या झाली. त्यानंतर आठ महिन्यांच्या आत म्हणजे ११ सप्टेंबर १९४८ रोजी जीनांना दीर्घ आजारानंतर मृत्यू आला. म्हणजेच भारतीय उपखंडातील दोन देशांचे दोन राष्ट्रपिते भारत व पाकिस्तान यांच्या निर्मितीनंतर दीड वर्षांच्या आत काळाच्या पडद्याआड गेले. तरीही त्या दोघांबद्दल आणि भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल चर्चा-वाद, प्रबंध चालूच आहेत.
परंतु लोकमान्य टिळक आणि महमद अली जीना हे फक्त एकमेकांचे सहकारी वा स्वातंत्र्य चळवळीतील सहप्रवासी नव्हते, तर ‘कॉम्रेड्स इन आम्र्स’ होते; म्हणजेच सर्वार्थाने ‘भाई-भाई’ होते, हे काही अभ्यासकांना माहीत असले, तरी त्याची चर्चा वा वाच्यताही फारशी केली जात नाही. जणू काही स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या तीन दशकांचा इतिहास जीनांशिवाय लिहिला जाऊ शकतो!
नि:पक्षपातीपणे, यथार्थ संशोधन करून, शैलीदारपणे इतिहासलेखन- विशेषत: अर्वाचीन इतिहास लिहिण्यासाठी ज्यांची जगभर ख्याती आहे, अशा ए. जी. (अब्दुल गफूर) नूरानी यांनी टिळक आणि जीना या दोघांच्या संबंधांवर एक ग्रंथ लिहिला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन तीन महिन्यांपूर्वी कराचीमध्ये झाले तेव्हा अनेक व्यासंगी अभ्यासक, प्राध्यापक, राजकीय व्यक्ती, ज्येष्ठ पत्रकार हजर होते. वयाची जवळजवळ आठ दशके पार केलेल्या नूरानी यांनी स्वातंत्र्य व फाळणी दोन्ही जवळून पाहिली आहे. कट्टर भारतीय मुसलमान असूनही ते हिंदुद्वेष्टे, पाकिस्तानद्वेष्टे, जीना वा गांधी-नेहरूंविरोधी असे अजिबात नाहीत. अभ्यास करताना कोणताही पूर्वसमज मनात बाळगायचा नाही, मन खुले ठेवतानाच तात्कालिक स्थिती, संदर्भ, व्यक्ती यांचे उत्तम भान ठेवायचे आणि जितके जमेल तितके मूळ दस्तावेज पाहायचे, असे अस्सल संशोधकाचे निकष त्यांनी पाळले आहेत. त्यामुळे हा ग्रंथ केवळ भारतीय उपखंडाच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकणारा नाही, तर एका विशिष्ट कालखंडावर लक्ष केंद्रित करून इतिहासाचे नवे पैलू उलगडून दाखविणारा आहे. त्याचप्रमाणे टिळक व जीना यांच्या व्यक्तिमत्त्वावर, राजकीय शैलीवर आणि त्यांच्यातील अनोख्या संबंधांवर अनपेक्षित असा प्रकाश टाकणारा आहे.
सर्वसाधारणपणे पुणे करार, लखनौ करार, टिळकांचे जीनांनी घेतलेले वकीलपत्र, जीनांचे काँग्रेसमधील त्यावेळचे स्थान यासंबंधात जुजबी लेखनसंदर्भ घेतले गेले असले तरी त्या दोघांच्या संबंधांना ‘कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ असे संबोधण्याचे धाष्टर्य़ आजवर कुणीही केलेले नव्हते. नूरानी यांच्या ग्रंथातील जी परिशिष्टे आहेत, त्यात यासंबंधातील सर्व दस्तावेज मिळवून ते त्यांनी प्रसिद्ध केले आहेत.
टिळक आणि जीना यांचे त्यावेळचे संबंध पाहता असे वाटू लागते की, तोच ‘कॉम्रेड्स’चा धागा टिकला असता तर इंग्रजांना फाळणीचे कारस्थान रचता आले नसते आणि फाळणीही झाली नसती! हिंदू-मुस्लीम संबंध बऱ्याच अंशी सुदृढ राहून ‘अखंड हिंदुस्थान- अखंड भारत’ निर्माण झाला असता! जगातील एक प्रभावी, महाकाय देश निर्माण झाला असता आणि ‘महासत्ता’ होण्याची नुसती स्वप्ने पाहण्याची वेळ आपल्यावर आली नसती!
नूरानींच्या या ग्रंथाचे तसेही अनेक फायदे आहेत. एका भारतीयाने लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन कराचीच्या ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ने केले आहे. हे पुस्तक आता भारतात विकले जात असल्याने भारतात जीनांना- आणि त्याहीपेक्षा पाकिस्तानमध्ये फाळणीपर्यंतच्या जीनांना आणि अर्थातच टिळकांना समजून घेता येणे सोपे जाणार आहे. फाळणी झाली त्यावेळी टिळकांना जाऊन तब्बल २७ वर्षे झाली होती. याचाच अर्थ तेव्हाही अखंड हिंदुस्थानातल्या पाकिस्तानात टिळक हे नाव मागे पडले होते. तेव्हाच्या नव्या पिढीलाही- टिळकांनी काय केले, त्याहीपेक्षा जीनांनी आधीच्या काळात अखंड हिंदुस्थानसाठी- म्हणजेच स्वराज्यासाठी आणि टिळकांसाठी काय केले, हे माहीत असायची शक्यता नाही. आता तर ती शक्यता अधिकच अंधुक झाली आहे. काही थोडेफार संशोधक आणि कराची विद्यापीठात असलेले इतिहास संशोधक सोडले तर हा इतिहास त्यांच्या दृष्टीने पूर्ण नवा आहे.
टिळक आणि जीना यांचे संबंध किती दृढ होते, ते टिळकांवर भरण्यात आलेल्या राजद्रोहाच्या तिसऱ्या खटल्यात जीनांनी जो त्यांच्यासाठी प्रखर युक्तिवाद केला त्यावरून स्पष्ट होते. या खटल्यात टिळक संपूर्ण निर्दोष सुटले. अन्यथा त्यांना आणखी काही वर्षे तुरुंगात खितपत पडावे लागले असते. या खटल्याचा सर्व इतिवृत्तान्त या पुस्तकात देण्यात आला आहे. टिळकांवर भरण्यात आलेल्या राजद्रोहाचा हा खटला त्यांनी अहमदनगर आणि बेळगावमध्ये केलेल्या भाषणांसाठी होता. आणि जीनांना मराठी येत नसतानाही त्यांनी या मराठी भाषणांबद्दल टिळकांवर खटला कसा काय भरला जाऊ शकतो, असा मुद्दा उपस्थित केला होता. आधीच्या खटल्यांमध्ये टिळकांनी ज्याप्रमाणे प्रत्येक शब्दाचे बारकावे आणि त्याचे अर्थ खुलासेवार स्पष्ट केले, त्याचप्रमाणे याही खटल्यामध्ये जीनांनी मराठी स्टेनोग्राफरला जेरीला आणून त्याची लघुलिपी कशी विश्वासार्ह ठरू शकत नाही, याविषयी न्यायमूर्ती सर स्टॅन्ले बॅचलर आणि न्यायमूर्ती शहा यांच्या न्यायालयामध्ये जोरदार युक्तिवाद केला. हा खटला टिळक हरले असते तर..?
टिळकांविषयी जीनांना किती श्रद्धा वाटत होती, हे शब्दांत सांगता नाही येणार! विशेष हे, की ते टिळकांच्या बरोबरीने गांधीजी आणि गोखले यांच्याविषयीही तितकेच सश्रद्ध होते. गांधीजींबरोबरचे त्यांचे संबंध बिघडले तो कालखंड टिळकांचे निधन झाल्यानंतरचा! नूरानी यांनी एडविन एस. मॉन्टेग्यू यांच्या ‘इंडियन डायरी’मध्ये असलेले काही उतारे दिले आहेत. २७ नोव्हेंबर १९१७ च्या नोंदीत ते म्हणतात की, भारतीय समाजावर सर्वाधिक प्रभाव असणारी सध्याची एकमेव व्यक्ती म्हणून टिळकांचा उल्लेख करावा लागेल. ते राष्ट्रीय हीरो आहेत. त्यावेळच्या संयुक्त प्रांताचे लेफ्टनंट गव्हर्नर हेसुद्धा टिळकांना असणारी लोकप्रियता पाहून भारावून गेले होते. मंडालेहून सुटका होऊन येताच टिळकांनी काँग्रेसच्या कार्याला वाहून घेतले तेव्हा त्यांची लोकप्रियता शिखराला पोहोचली होती. याचे श्रेय मुस्लीम लीगसमवेत टिळकांनी घडवून आणलेल्या २१ ऑगस्ट १९१६ च्या ‘लखनौ करारा’कडेही जाते. या करारावर जेव्हा हिंदूंकडून अतिरेकी स्वरूपाची टीका होऊ लागली, तेव्हा त्यांनी दिलेले तडफदार उत्तर आजच्या काँग्रेस नेत्यांनाही देता येणे शक्य नाही. ते म्हणाले होते की, ‘केवळ मुसलमानांना स्वराज्याचे अधिकार देण्यात आले तरी त्याचे आम्हास काही वाटणार नाही. कारण त्यानंतर या लढय़ाचे स्वरूप आजच्याप्रमाणे तिरंगी राहणार नाही.’ हे त्यांचे धीरोदात्त रूप तेव्हा पाहायला मिळाल्यानेच हसरत मोहानीसारखा प्रख्यात शायर (‘चुपके चुपके रात-दिन’ गझल फेम!) टिळकांच्या प्रेमात पडला. त्याने त्यावेळी लिहिलेले मूळ उर्दू काव्यही आपल्याला या ग्रंथात वाचायला मिळते. हा कवी म्हणतो..
‘ऐ तिलक ऐ इफ्म्तख़ारे जज्म्बए हुब्बे वतन
हक़ शनासो, हक़पसंदो, हक़ यक़ीनो हक़ सुख़न।।
तुझसे क़ायम है बिना आज्मादिये बेबाक की
तुझसे रौशन अहले इख़्लासो वफ़ा की अन्जुमन।।
सबसे पहले तूने की बर्दाश्त ऐ फ़ज़्र्‍ान्दे हिन्द
ख़िद्मते हिन्दोस्ताँ में कुल्फ़ते कैदे महन।।
ज़ात तेरी रहनुमाए राहे आज्मादी हुई
थे गिरफ्म्तारे ग़ुलामी वरन: याराने वतन।।
तूने ख़ुद्दारी का फूंका ऐ तिलक ऐसा फ़ुसूँ
यक क़लम जिससे ख़ुशामद की मिटी रस्मे कुहन।।
नाज़्‍ा तेरी पैरवी पर हस्रते आज़ाद को
ऐ तुझे क़ायम रखे तादेर रब्बे ज़ुलमनन’।।
(थोडक्यात- देशभक्तीच्या अभिमानस्वरूपा, देशाच्या सुपुत्रा, तुला भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जावे लागले. समाजाला तू आहेस म्हणून, अन्यथा असंख्य जिवांना गुलामगिरीच्या जोखडाखाली राहावे लागले असते. तू जो काही आत्मसन्मान लाभू दिला आहेस तो अपूर्व असा आहे. स्वतंत्र प्रज्ञेचा हा हसरत तुझ्या पावलांवर पाऊल टाकून पुढे वाटचाल करणार आहे. आपल्या कार्यसिद्धीसाठी शक्तिशाली परमेश्वर तुला दीर्घायुरारोग्य देवो!)
विशेष हे, की टिळकांचा एखाद् दुसरा चरित्रकार सोडला तर कुणीही हसरत मोहानी यांच्या या श्रद्धेविषयी मनापासून फारसे लिहिलेले नाही.
लखनौ कराराने ब्रिटिश सत्ताधाऱ्यांना एका अर्थाने जबर धक्का बसला होता. काँग्रेस आणि मुस्लीम लीग स्वराज्यप्राप्तीसाठी अशा पद्धतीने एकत्र येतील असे त्यांनी स्वप्नातसुद्धा पाहिले नव्हते. त्याआधी जेव्हा या कराराचे स्वरूप ठरवण्यासाठी मुस्लीम लीगचे अधिवेशन मुंबईच्या ताजमहाल हॉटेलमध्ये १९१६ च्या नववर्षदिनी भरायचे घाटत होते तेव्हा ब्रिटिशांनी ते कसे उधळून लावता येईल, याकडे बारकाईने लक्ष पुरविले होते. त्यावेळी जीनांनी सुधारणांसाठीचा एक मसुदा तयार करून सभेपुढे ठेवला आणि त्यास मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एप्रिलमध्ये काँग्रेस महासमितीची बैठक होऊन त्यात संमत केलेला ठराव मुस्लीम लीगकडे पाठविण्यात आला. हे सहकार्य पद्धतशीर होते. दोन समाज एकत्र राहावेत म्हणून ते होते. मुस्लीम लीगच्या लाहोरच्या बैठकीत तर टिळक प्रमुख पाहुणे म्हणून हजर असल्याचे इतिहास सांगतो. गोहत्याबंदीचा ठरावही लाहोरच्या या ऐतिहासिक अधिवेशनातलाच! काँग्रेसमध्ये जहालांचे स्थान पक्के करण्यासाठी जीना आणि टिळक यांनी एकत्रितरीत्या काम केले ती दोन वर्षेसुद्धा १९१५ आणि १९१६ हीच होत!
मंडालेच्या अटकेतून सुटून आल्यावर टिळकांजवळ एवढी ऊर्जा कशी आली होती, हे आजही गूढ वाटते. त्या काळातले टिळक आणि जीना आपल्याला कळतात ते सदाशिवराव बापटांच्या आठवणींमधून किंवा टिळकांसमवेत काम करणारे न. चिं. केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्यासारख्यांच्या लिखाणातून! विशेष हे, की त्यांच्या आणि खुद्द टिळकांच्या लिखाणातून आपल्याला जीना कळतात. बापटांच्या आठवणींचे भाषांतर तेव्हा बॅ. जयकरांनी करून ठेवले नसते तर कदाचित महाराष्ट्राबाहेरचे इतिहासकार एका समृद्ध ठेव्याला मुकले असते. हे नुरानींच्या या पुस्तकावरूनही जाणवते.
टिळकांचे १९२० मध्ये निधन झाल्यावर बरोबर सात वर्षांनी, आपण मुस्लिमांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या बाजूने नाही, पण त्यामागे मुस्लीम लीगचे बहुमत आजही आहे, हे त्यांनी मान्य केले होते. डॉ. एम. ए. अन्सारी यांना अल्लामा इक्बाल यांनी १९३५ च्या नववर्षदिनी लिहिलेल्या पत्रातही ‘आता हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र काम करण्याची वेळ आली आहे,’ असे म्हटले होते. ‘बॉम्बे क्रॉनिकल’चे त्यावेळचे संपादक सईद अब्दुल्ला ब्रेलवी यांनीही आपले मत नोंदवले होते. त्यात त्यांनी जीना यांच्याशी बोलल्यानंतर आपल्याला काय वाटते, ते स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की, जीनांनी त्याही वेळी आपण उभयपक्षी (हिंदू आणि मुस्लीम) मान्य होईल असा कोणताही तोडगा काढण्यास तयार आहोत, असे म्हटले होते. याचाही अर्थ- जीना तोपर्यंत खूपच बदलले, असा जो लावण्यात येतो तो खरा नव्हे, असे सांगणारा आहे. या पुस्तकात असणारा सारा पत्रव्यवहार पाहता आणि अस्सल कागदपत्रांच्या आधारे दिलेली उपयुक्त माहिती लक्षात घेता इतिहासाच्या अभ्यासकांना हा ग्रंथ उपयुक्त ठरणारा आहे. काँग्रेसने टिळकांपासून मुस्लिमांचे लांगूलचालन सुरू केले, असा दावा करणारे संघ परिवारवादी काहीही म्हणोत, फाळणी वाचवायचे प्रयत्न टिळकांपासूनच सुरू झाले आणि ते अगदी १९४६ पर्यंत- म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत- आणि जीनांच्या बाजूने चालू होते. अगदी जीनांना पंतप्रधान करून आणि मंत्रिमंडळ निवडीचे अधिकार देऊन हा गुंता सुटावा यासाठीचे ते प्रयत्न होते. त्यात यश येते, तर इतिहासाचे रूप नक्कीच पालटले असते. नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते.
‘जीना अ‍ॅण्ड टिळक : कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ लिहिणारे ए. जी. नूरानी हे सर्वोच्च न्यायालयातील वकील म्हणून ख्यातकीर्त आहेत. ते घटनातज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. ‘हिंदू’पासून ‘डॉन’पर्यंत त्यांचा लेखनप्रवास आहे. ते ‘फ्रंटलाइन’मध्येही लिहितात. ते ‘इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकली’चे स्तंभलेखक आहेत. अगदी शेवटच्या- म्हणजे फाळणी होण्यापूर्वीच्या टप्प्यातही जीनांना मुस्लिमांचे अधिकार शाबूत ठेवून महासंघही चालला असता, असे नूरानींचे मत आहे. अर्थात त्यांना काय घडवायचे होते आणि काय घडले, हा प्रश्न अलाहिदा!
आंतरराष्ट्रीय राजकारणाचा व्यूहात्मक अभ्यास करणारे असेही म्हणू शकतील की, जर फाळणी झाली नसती आणि ‘इस्लाम-अधिष्ठित पाकिस्तान’ निर्माण झाला नसता तर कदाचित मूलतत्त्ववादी व दहशतवादी इस्लामी पंथ तयार झाला नसता, किंवा जन्माला आला असता तरी आजच्यासारखा फोफावला नसता! म्हणजेच आज दिसणारे पाकिस्तान-अफगाणिस्तान-अमेरिका किंवा पाकिस्तान-चीन-भारत असे अस्वस्थ सत्ता-त्रिकोण निर्माण झाले नसते. इस्लामी मूलतत्त्ववादाचा उगम व विकास जरी अरब राष्ट्रांत झाला असला तरी एकेकाळी अरब संस्कृती व ‘सिव्हिलायझेशन’ हे युरोपपेक्षाही प्रगत होते आणि तो प्रगत अरब संस्कृतीचा स्रोत अधिक प्रभावशाली ठरून धर्मवादी व प्रतिगामी इस्लामी राजकारणाचा पराभव झाला असता! हिंदुस्थानच्या फाळणीमुळे सनातनी इस्लामला भारतीय उपखंडात मुळे रोवता आली, हे तर कुणीही मान्य करील!

(सौजन्य - लोकसत्ता दिनांक ०१ ऑगस्ट २०१० लेखक - श्री. कुमार केतकर)

सोमवार, २६ जुलै, २०१०

आद्यगुरू- वेदव्यास

व्यासरचित महाभारत भारतीय जीवनाशी अगदी एकरूप झाले आहे. एखादी कठोर प्रतिज्ञा ही भीष्मप्रतिज्ञा या नावाने ओळखली जाते तर उदार व्यक्तीला कर्णाची उपमा मिळते. एकाग्रतेचं उदाहरण द्यायचं झालं तर अर्जुन मापदंड ठरतो आणि कुठे मोठं भांडण सुरू असेल तर ‘काय महाभारत सुरू आहे’ असं सहजपणे म्हटलं जातं. दूरदर्शनवर महाभारत ही मालिका सुरू असताना साऱ्या भारतभर रस्त्यारस्त्यांतून कसा शुकशुकाट असायचा याची रसभरीत वर्णनं त्या वेळी वृत्तपत्रांतून येत असत. नाटय़-चित्रपटसृष्टीही या प्रभावांतून दूर राहू शकली नाही. महाभारतावर आधारित अनेक नाटकं किंवा ‘कलयुग’ आणि अगदी अलीकडला ‘राजनीती’ यांसारखे चित्रपटही आले. पण मला आठवतो तो न. चिं. केळकरांसारख्या विद्वान वाचकाच्या आयुष्यातला प्रसंग! त्यांना एकदा कुणीतरी विचारले, तुम्हाला दीर्घकाळापर्यंत विजनवासात राहावे लागले व त्या वेळी केवळ एकच ग्रंथ बरोबर नेता येणार असेल तर तुम्ही कोणता न्याल? क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उत्तर दिले होते, महाभारत.
व्यासांचे कुळ
व्यासांचे मूळ नाव कृष्ण द्वैपायन. वेद व पुराणांत सापडणाऱ्या वर्णनांवरून कश्यप, जमदग्नी, अत्री, गौतम, विश्वामित्र, भारद्वाज व वसिष्ठ या सप्तर्षीपैकी वसिष्ठांच्या कुळात व्यासांचा जन्म झाला. हे सर्व मंत्रद्रष्टे ऋषी आहेत. यांपैकी ऋग्वेदातील एक्काहत्तर मंत्र कश्यपांनी, एकोणऐंशी जमदग्नींनी, एकशेतीस अत्रींनी, दोनशे अकरा गौतमांनी, पाचशे एक विश्वामित्रांनी तर सर्वात जास्त म्हणजे आठशे अठ्ठेचाळीस मंत्र वसिष्ठांनी रचले. म्हणूनच वसिष्ठांचे स्थान या सर्वामध्ये वरचे आहे. अशा मंत्रकर्त्यां व ब्रह्मविद्या जाणणाऱ्या वसिष्ठांचा पुत्र शक्ती, शक्तीचा पुत्र पराशर व पराशर- मत्स्यगंधेचा पुत्र व्यास. पुढे विश्वमित्र- वसिष्ठ संघर्षांत विश्वामित्रांनी वसिष्ठांच्या सर्व पुत्रांना ठार केले. हे सर्व पुत्र वेदपारंगत व मंत्रद्रष्टे होते. पण त्यातील शक्तीला वसिष्ठांनी कुलपरंपरेने चालत आलेली ब्रह्मविद्या दिली होती. हा शक्तीही ठार झाल्यावर संपूर्ण ज्ञानाचा ऱ्हास झालासे पाहून वसिष्ठ बेचैन झाले व वेडय़ासारखे इतस्तत: भटकू लागले. ते असे भटकत असता त्यांची स्नुषा म्हणजे शक्तीची पत्नी त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्यामागून जाऊ लागली. अशा वेळी त्यांना वेदाध्ययनाचा ध्वनी ऐकू आला. त्या वेळी वेदपठण कोण करत आहे असे त्यांनी विचारले असता, भगवान शक्तीचा गर्भ मी धारण केला आहे व तोच हे उच्चारण करत आहे असे तिने सांगितल्यावर आपली कुलपरंपरा व ब्रह्मविद्यासंप्रदाय राखणारे कुलात कुणीतरी आहे हे पाहून वसिष्ठ निश्चिंत होऊन आश्रमात परत आले. गर्भातच हे वेदपठण करणारा मुलगा म्हणजे पराशर. आज उपलब्ध असलेल्या ऋग्वेदसंहितेत शक्तीचे नऊ तर पराशरांचे एकशे पाच मंत्र आहेत. थोडक्यात व्यासांचा जन्म केवळ मंत्रद्रष्टय़ा ऋषीकुलात झाला आहे असे नव्हे तर ब्रह्मविद्याप्रवर्तक कुलात झाला होता.
व्यासांचे कार्य
१. वेदांची विभागणी - ‘अनन्ता वै वेदा:’ म्हणजे वेद अनंत होते. वेदांच्या अनंतत्त्वाविषयी एक कथा तैत्तिरिय ब्राह्मणात आली आहे. पूर्वी वेद ही अति प्रचंड ज्ञानराशी होती. द्वापारयुगात ती संपूर्ण ज्ञानराशी जाणावी अशी महत्त्वाकांक्षा भारद्वाज ऋषींना झाली. त्यांनी घोर तपश्चर्या केली. प्रसन्न झालेल्या परमेश्वराने त्यांना वर मागण्यास सांगितले. भारद्वाजाने सर्व वेद मला प्राप्त व्हावा अशी इच्छा व्यक्त करताच अत्यंत प्रखर अशी ज्ञानराशी त्यांच्यासमोर प्रकट झाली. पण एवढे प्रचंड ज्ञान ग्रहण करणे अशक्यप्राय आहे असे म्हणून भारद्वाजांनी केवळ मूठभर ज्ञान ग्रहण केले. या कथेतून दोन गोष्टी लक्षात येतात-
एक म्हणजे प्रचंड अशा ज्ञानराशीचा अल्पभागच कलियुगात आपल्यापर्यंत आला होता आणि भारद्वाज ऋषींसारख्या विद्वान माणसालाही हे सर्वच्या सर्व ज्ञान ग्रहण करणे अशक्य होते तर सामान्य माणसाला ते कसे ग्रहण करता येणार? याचा परिणाम असा झाला की हे ज्ञान लुप्त होऊ लागले. वेद हे जसे धर्माचे मूळ आहे तसे ते ज्ञानाचेही मूळ असल्यामुळे ते जतन करणे गरजेचे होते. अशा वेळी या एका ज्ञानराशीची विभागणी व्यासांनी केली. विष्णुपुराणांत यासंबंधी एक श्लोक येतो-
द्वापारे द्वापारे विष्णुव्यासरूपे महामति:।
वेदमेकं स बहुधा कुरुते जगतो हितम्।।
(अर्थ- द्वापारयुगात एकच असलेल्या वेदाची विभागणी जगाच्या हितासाठी व्यासांनी केली.) त्यांनी ‘वेदान् विव्यास’ म्हणजे वेदांचे विभाजन केले त्यामुळे कृष्ण द्वैपायन हे ‘व्यास’ झाले. पण केवळ वेदांचे विभाजन होऊन चालणार नव्हते. या शुद्ध ज्ञानराशीचा प्रचार व प्रसार होण्याचीही गरज होती. त्यामुळे त्यांनी आपल्या एकेका शिष्याला एकेक वेद दिला. त्यांनी ऋग्वेद पैलाला, सामवेद जैमिनीला, यजुर्वेद वैशंपायनाला तर अथर्ववेद सुमंतूला देऊन त्यांना ही खंडित ज्ञानसरीता समाजात प्रवाहित करण्यास पाठवले.
२. महाभारत- व्यासांचे दुसरे महान कार्य म्हणजे महाभारताची निर्मिती. भारतीय जीवनशैलीचा आधारस्तंभ असणाऱ्या धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाची महती सामान्यांना सांगायची तर केवळ रुक्ष तात्त्विक चर्चा करण्यापेक्षा कथेच्या अंगाने केली तर ती लवकर पचनी पडते म्हणून ‘जय’ हा पांडवांच्या जयाचा इतिहास व्यासांनी रचला. मूळ जय नामक भारत ८८०० श्लोकांचे आहे असे मानले जाते कारण आदिपर्वाच्या सुरुवातीला
अष्टौ श्लोकसहस्राणि अष्टौ श्लोकशतानि च।
अहं वेद्मि शुको वेति संजयो वेति वा न वा।। (आदि. १.८१)
(अर्थ- ८८०० श्लोक मी जाणतो. शुक जाणतो संजय जाणतो, अथवा जाणत नाही) असे व्यासांनीच लिहून ठेवले आहे. पण या संख्येविषयी विद्वानांत एकमत नाही.
काही विद्वानांच्या मते महाभारतातील कूटश्लोकांची संख्याच ८८०० इतकी आहे. असे असले तरी ब्रह्मविद्या जाणणारे व्यास व त्यांचा मुलगा शुक यांना हे कूटश्लोक माहिती असणं शक्य आहे पण व्यासांच्या आशीवार्दाने दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या संजयाला हे गहनश्लोक कळले असतील का, याविषयी शंकाच आहे. ८८०० ही कूटश्लोकांची संख्या असावी याला आणखी एक पुरावा म्हणजे आदिपर्वातील काही श्लोकांनुसार महाभारत २४००० श्लोकांचे होते व नंतर संपूर्ण मानवजात, गंधर्व इत्यादी लोकांसाठी त्यात भर घालून ते एक लाख श्लोकांचे बनले. विद्वानांत श्लोकसंख्येवरून अजूनही चर्चा चालू असली तरी सामान्यपणे महाभारताची तीन संस्करणे मानली जातात-
१. जय- ८८०० श्लोक हे व्यासांनी रचले व याचा कथाभाग कौरव-पांडव उत्पत्ती ते भारतीय युद्ध समाप्तीपर्यंत आहे.
२. भारत- पांडवांच्या चौथ्या पिढीत जन्मलेल्या जनमेजयाला पूर्वजांचा इतिहास सविस्तर जाणून घ्यायची इच्छा झाल्याने वैशंपायनाने सांगितला. तो पौरववंशाच्या प्रारंभापासून असल्याने त्यात खूप भर पडली व श्लोकसंख्या ३०००० वर गेली.
३. महाभारत- नैमिषारण्यात एका द्वादशवार्षिक सत्रात म्हणजे बारा वर्षे चालणाऱ्या यज्ञात सौतीने शौनक ऋषींना सांगितले. या वेळी शौनकांनी अनेक प्रस्न विचारले. त्यांची उत्तरे सौती देत गेला व श्लोकसंख्या लाखाच्या घरात गेली. आज उपलब्ध असलेले महाभारत ते हेच.
महाभारत हा कौरव-पांडवांच्या युद्धाचा इतिहास असला तरी त्याच्याबरोबर त्या वेळची समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, आश्रमव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, आध्यात्म, चार पुरुषार्थ, राजनीती असे अनेक विषय असल्यामुळे त्याला पाचवा वेद मानले जाते. राज्याच्या सात अंगांवर फार विस्तृत चर्चा महाभारतात असल्यामुळे त्याला क्षत्रिय वेद असेही म्हटले जाते.
भारतीय समाजरचनेत ऐहिक गोष्टींना तुलनेनी कमी महत्त्व असले तरी त्याला विरोध होता असे मुळीच नव्हे. पारलौकिकाची प्राप्ती करायची तर अध्यात्म हवे पण रिकाम्या पोटी अध्यात्म सुचत नाही, याचेही भान सुटले नव्हते. लौकिक जीवनात अर्थ महत्त्वाचा आहे. समृद्ध आयुष्य जगणे हा मानवाचा अधिकार आहे. फक्त ही समृद्धी कशी मिळवावी याचे नियम असावेत हे महाभारताचे तत्त्व आहे. समाजाला बंधनात ठेवायला राजसत्तेचा अंकुश असणे गरजेचे असते हे व्यासांना माहीत होते. पण ‘यथा राजा तथा प्रजा’ म्हणून हा राजा कसा असावा याचे विस्तृत वर्णन शांतिपर्वात येते. राजा कोणाला म्हणावे ते सांगताना व्यास म्हणतात ‘रञ्जिताश्च प्रजा: सर्वा तेन राजेति कथ्यते’ म्हणजे जो प्रजेला आनंद देतो तो राजा. खरंतर केवळ एका वाक्यात राजाचं कर्तव्य व्यासांनी सांगितलं होतं. पण हे पुरेसं न वाटल्यामुळे की काय व्यास म्हणतात,
यथा ही गर्भिणी हित्वा स्वं प्रियं मनसो नुगम।
गर्भस्य हितमाधत्ते तथा राज्ञाप्यसंशयम। (शांतिपर्व ५६.४५)
(अर्थ- ज्याप्रमाणे गर्भिणी स्त्री स्वत:ला काय आवडतं याचा विचार न करता उदरातील गर्भाचा विचार करते त्या प्रमाणे राजाने वागले पाहिजे.)
राजधर्माचा इतका उच्चतम आदर्श प्राचीन काळी जगात कुठेच सांगितला गेलेला नाही. हा जयाचा इतिहास असल्यामुळे युद्ध, शांतता याची आवश्यकता याचीही चर्चा आहे.
महाभारतातील महत्त्वाचा ग्रंथ ‘भगवद्गीता’, कर्तव्याचं विस्मरण झालेला अर्जुन हा जरी गीतेचं निमित्त असला तरी ही किंकर्तव्यता प्रत्येक माणसाला कधी ना कधी येतेच. अशा वेळी सर्वाना उत्तम मार्गदर्शन देणारा ग्रंथ म्हणजे गीता. कर्म, भक्ती, ज्ञान व योग यांपैकी ज्याला जो मार्ग रुचेल, पचेल तो त्याने स्वीकारावा व नित्य- नैमित्तिक कर्म करता करता मोक्षाची वाट चालावी हा साधा सोपा संदेश गीतेच्याद्वारे व्यासांनी दिल्यामुळेच भगवद्गीता हा जगातला एक उत्कृष्ट ग्रंथ ठरला आहे.
जीवनाच्या जवळजवळ सर्वच अंगांना महाभारताने स्पर्श केल्यामुळेच-
धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च भरतार्षभ।
यदिहास्ति तदन्यत्र यन्न्ोहास्ति तन्न क्वचित।
(अर्थ- धर्म, अर्थ, काम व मोक्ष अशा सर्वच विषयांतील ज्ञान जे इथे आहे तेच सर्वत्र आहे पण जे इथे नाही ते क्वचितच इतरत्र आढळेल.) असे जे म्हटले जाते ते सत्य आहे.
३. पुराणे- महाभारताशिवाय व्यासांनी पुराणांची रचना केली. यासाठी त्यांनी प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या अनेक दंतकथा, लोककथा, आख्याने, उपाख्याने यांचा संग्रह करून पुराणाची एक मूल संहिता तयार केली व आपला शिष्य रोमहर्षणाला दिली. त्याने या मूल संहितेच्या वेगवेगळ्या संहिता तयार केल्या तीच ही अठरा पुराणे होत.
पुरा नवं भवति, पुरा म्हणजे जुनी असूनही जी नवीन भासतात ती पुराणं. पुराणांमध्ये सृष्टीची उत्पत्ती, प्रलय, चौदा विद्या, वेगवेगळ्या राजांची चरित्रे असे विविध विषय आहेत.
व्यासांचा सामाजिक दृष्टिकोन
महाभारताच्या वेळी - समाजात हिंदू, जैन, बुद्ध अशी दरी पडायला सुरुवात झाली होती. राम- कृष्णांसारख्या वंदनीय पुरुषांची निंदा करण्याची प्रथा आली.
बुद्ध धर्मामुळे संन्यास धर्माचे महत्त्व अतोनात वाढले. लोक प्रवृत्तीपेक्षा अकाली निवृत्तीकडे वळू लागले. कर्म करण्यापेक्षा भिक्षेवर उदरनिर्वाह करण्यात धन्यता वाटायला लागली. अशा वेळी गीतेने कर्माचे महत्त्व वाढवले. नकुलाख्यानासारख्या आख्यानांद्वारे जैन धर्मातील अहिंसेला सनातन धर्मातही मानाचे स्थान आहे याची जाणीव करून दिली. अनुगीतेद्वारे बौद्धांच्या संन्यासमार्गाला हिंदू धर्मात सामावून घेतले.
थोडक्यात वेगवेगळ्या संप्रदायांमुळे भारतीय समाजात पडलेली दुही दूर करून समाजाला प्रवृत्तीकडे वळवले.
समाजात लोकवाङ्मय विखुरलेले असते. आजही या लोकवाङ्मयाकडे फारशा आपुलकीने पाहिले जातेच असे नाही. याचा परिणाम म्हणजे समाजातील एक मोठा गट मूळ प्रवाहापासून दूर राहतो. या लोकवाङ्मयाचे संकलन व परिष्करण करणे गरजेचे असते. व्यासांनी या लोकवाङ्मयाचे केवळ संकलन केले असे नव्हे तर पुराणांमध्ये अशा विखुरलेल्या कथांना समाविष्ट करून त्यांना श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला. यामुळे लोकसंस्कृती व नागरसंस्कृतीचे एकीकरण झाले. वेगवेगळ्या जाती, जमाती, समूह यांचा मूळ सांस्कृतिक धारेत समावेश झाला. पुराणांत वेगवेगळ्या तीर्थाचे महत्त्व व त्यांच्या भेटीचे फळ सांगितल्यामुळे तीर्थस्थळांना भेटी द्यायची प्रथा सुरू झाली. त्यामुळे हा निसर्ग सुंदर व पवित्र भारत माझा आहे असा विचार रुजला व भारतीय समाजात एकोपा वाढीस लागला.
कालपरत्वे समाजात, धार्मिक चालीरीतींत अनेक बदल होत असतात हे ओळखून व्यासांनी मूळच्या वैदिक धर्मात आवश्यक ते बदल केले व त्यांचा समावेश पुराणांत करून सर्वत्र प्रसार केला. त्यामुळे मूळ वैदिक धर्माशी असलेली आपली नाळ तुटली नाही. आजही कोणत्याही धार्मिक कार्यारंभी श्रुति- स्मृति पुराणोक्त असे म्हणण्याची पद्धत आहे ती त्यामुळेच. या ठिकाणी मला ग्रीक व रोमन संस्कृतींचे स्मरण होते. प्राचीन काळातील त्याही अशाच अत्यंत प्रगत संस्कृती. पण कालपरत्वे आवश्यक ते बदल त्यांच्यात झाले नाहीत व दोन्ही संस्कृती नामशेष झाल्या, पण वैदिक संस्कृती अशा प्रकारे टिकवून ठेवण्याचे श्रेय व्यासांना जाते. भारतीय परंपरा अक्षुण्ण राखणाऱ्या व्यासांमुळे गुरूपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून ओळखली जाते.
फ्रान्समध्ये इसवीसनाच्या पंधराव्या शतकात सामाजिक पुनरुज्जीवन झाले. आपल्या इतिहासात असे पहिले पुनरुत्थान व्यासांनी घडवले. जर फ्रान्समधील पुनरुज्जीवन मानवाभोवती केंद्रित होते तर व्यासांनीही मानवाला फार महत्त्वाचे स्थान दिले आहे. म्हणूनच न हि मानुषात। श्रेष्ठतरं हि किंचित। (माणसापेक्षा श्रेष्ठ असे काहीच नाही) असे स्वत: व्यासांनी शांतिपर्वात सांगून ठेवले आहे. मानव व त्याच्या कर्तृत्वाला व्यासांनी केंद्रस्थानी मानले होते. त्यामुळेच शांतिपर्वात व्यास कष्ट करणाऱ्या हातांची अपेक्षा करताना म्हणतात, ज्यांना हात आहेत ते काय करू शकणार नाहीत. ज्यांना हात आहेत ते सिद्धार्थ होत. ज्यांना हात आहेत ते मला अतिशय आवडतात. जशी इतरांना धनाची अपेक्षा असते तशी मला हातांची अपेक्षा आहे. हातांच्या लाभापेक्षा दुसरा अन्य कोणताही लाभ मोठा नाही।
महाभारतकर्त्यां व्यासांच्या क्रांतदर्शित्वाचा हा प्रभाव आहे. त्यांची प्रगल्भता, अनुपमेय बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, कवित्व व या सर्वापेक्षा मानवजातीविषयीचा कळवळा अशा अनेक गुणांमुळेच ज्या ठिकाणी उभे राहून व्याख्यान दिलं जातं त्या स्थानाला व्यासपीठ असं म्हणतात. व्यासपीठावर उभं राहून व्याख्यान देणाऱ्या वक्त्याला व्यासांचे हे आदर्श डोळ्यापुढे ठेवणं बंधनकारक आहे याची जाणीव प्रत्येक वक्त्याने ठेवली पाहिजे.

(हा लेख माझा नसुन. आजच्या लोकसत्ता या पेपर मधे आसावरी बापट यांचा नावावर छापुन आला आहे. हा लेख संग्रही रहावा म्हणुन इथे कॉपी पेस्ट केला आहे.)

रविवार, २५ जुलै, २०१०

सिद्धीगिरी संग्राहलय

कोल्हापुरच्या पुढे बेळगावच्या वाटेवर असेलेल्या सिद्धीगिरी संग्राहलयातील ह्या काहि कलाकृती.












गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


श्री स्वामीचरणी विनम्र दंडवत आणि तुम्हां सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः
गुरु साक्षात् परम ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः

शनिवार, २४ जुलै, २०१०

मित्र जीवांचे (???)

धडाकेबाज या पिक्चरमधे एक गाणे आहे "हि दोस्ती तुटायची नाय...."

जीवाभावाचे, एकमेकांसाठी जीव हि देणारे दोस्त खरेच दोस्त असतात का?

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात एकदा तरी असा प्रसंग आलेला असतो जेव्हा आपले कोण आणि परके कोण याची पारख झालेली असते. ज्यांच्याबरोबर काल परवा पर्यंत एका ताटात जेवलेले असतो तेच आज आपल्या वाईट प्रसंगी पाठ फिरवुन गेलेले असतात. ज्यांच्यासाठी नकोत्या कारणासाठी, नको तिथे, नको तेवढे पैसे खर्च केलेले असतात तेच मित्र आज आपल्याला मदत करताना वेगवेगळी कारणे सांगत असतात.

अश्या वाईट प्रसंगी आपल्या घरचेच आपल्यापाठीशी खंबीरपणे उभे राहतात. ज्यांचे बोलणे आपल्याला एकेकाळी कटु वाटत असतात पण त्यांच्याच खांद्यावर डोके ठेवुन मन मोकळे करण्यासाठी आपण आपल्या वाईट प्रसंगी आतुर असतो.

खुप वेळा या मित्रांना खड्ड्यातुन बाहेर काढताना आपणच खड्ड्यात गेलेलो असतो. तरी आपण त्यांना आपले मित्र म्हणवुन घेतो.

हे सर्व लिहायचे कारण की..... कालच माझ्या एका ओळखीच्या मुलाचे लग्न अश्या नालायक मित्रांमुळे पुढे ढकलता ढकलता वाचले.

त्याचे असे झाले की, या येड्याने एकेकाळी मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्ट्याकरण्यासाठी, मैत्रिंणीना फिरवण्यासाठी, जुगाराची आणि बारची बिले भरण्यासाठी मित्रांना सढळ हस्ते खुप मदत केली होती. हा हिरो जेव्हा स्वबळावर लग्न करायला निघाला तेव्हा १००००/- ची मदत (?) करायला हि याचे मित्र तयार नव्हते. आणि मदत कसली खरेतर याचेच पैसे जे अजुन कोणी दिले नव्हते ते परत करायला तयार नव्हते. शेवटी लग्न पुढे ढकलायची वेळ आली तेव्हा याने घरच्यांना खरी कल्पना देवुन वडिलांकडुन पैसे घेतले.

पण नंतर या मुलाने एक गोष्ट खुपच चांगली केली ती म्हणजे घरचे ठाम पाठीशी उभे राहिल्यानंतर सर्वात पहिले काम काय केले तर याने ज्यांना मदत केली होती व त्यांनी आता याला मदत करायची टाळाटाळ केली त्यांच्या बरोबर सरळ संबंध तोडुन टाकले.

या सर्व प्रसंगावरुन मलाच प्रश्न पडला, खरे मित्र खरेच असतात का?

सोमवार, ५ जुलै, २०१०

कात्रज सर्पोद्यान

नुकतेच पुण्याच्या कात्रज सर्पोद्यानला भेट देण्याचा योग आला. अतिशय अप्रतिम उद्दान आहे. - तास कसे गेले हेच समजले नाहि. सर्वांनी आवर्जुन भेट द्यावी असे ठिकाण आहे. पर्यावरणाची पण खुपच छान प्रकारे निगा राखली आहे. प्लास्टीकची बॉटल असेल तर डिपॉझीट घेतले जातेआणि जाताना ते परत करतात. जेणेकरुन लोकांनी आत जावुन प्लास्टीकची बॉटल कोठे हि टाकु नये.











(सर्व फोटो मोबाईल कॅमेरा मधुन घेतले आहेत त्यामुळे नीट आले नाहि आहेत. त्या बद्दल क्षमस्व)

सोमवार, ३१ मे, २०१०

मुक्ताफळे.....

१. इच्छा आहे तिथे अडथळे असणाराच.

२. कोणतेहि काम करण्याचा आणखी एक सोपा मार्ग असतो.

३. ज्याच्याकडे एकच घड्याळ आहे त्याला वेळ कळते. ज्याच्याकडे दोन घड्याळं असतात, त्याला खात्री नसते.

४. समस्येचं निरकरण होत असताना एक नविन समस्या निर्माण होते.

५. तुम्हि तुमची कार स्वच्छ धुतलीत कि पाऊस येतो.

६. दुपारी डुलकी लागली कि कुरियरवाला येतो.

७. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच. मग ते उत्तर तुम्हाला आवडो वा न आवडो.

८. सिगरेटमुळे बिनडोक माणसाला तोंडात धरायला काहि तरी मिळतं

९. जो घोरतो तोच आधी झोपलेला असतो.

१०. जो बराच काळ मोठ्याने हसतो त्यालाच विनोद कळलेला नसतो.

११. तुम्हि काम हातावेगळे करुन आरामात रेलुन बसता तेव्हाच केबिनमधुन बॉस बाहेर येतो.

१२. नव्या कोर्‍या टायला नेहमीच सुपात बुडायला आवडतं

१३. तुम्हि रेडिओ लावा. तुमच्या आवडत्या गाण्याच्या शेवटच्याच ओळी ऐकायला मिळतात.

१४. कर्ज घेण्यापुर्वी नेहमीच आपण किती श्रीमंत आहोत ते दाखवावे लागतं.

१५. कोणत्याहि वादातुन पैसे निर्माण होण्याची शकत्या खुपच जास्त असते.

१६. प्रत्येक यशस्वी पुरषामागे एक बाई असते आणी अयशस्वी पुरषामागे दोन बायका असतात.

१७. सर्वांना मरण येणार हे नक्किच असतं पण मरणाच्या दारात पोहचे पर्यंत एक आयुष्य फुकट जातं.

१८. गणितातील सर्वात मोठी गमंत म्हणजे - १००० वर्ष संपली, करोडो सुत्र तयार झाली आहेत पण अजुन हि 'X' ची किंमत कळली नाहि आहे.

१९. आज हि देवळाच्या बाहेर तुफान गर्दि असते कारण गुगलवर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळत नाहि.

२०. यशाचे गमक काय तर अचुक निर्णय, अचुक निर्णय अनुभवातुन येतो आणि अनुभव चुकिच्या निर्णयातुन...

रविवार, ३० मे, २०१०

गमती जमती

आज मला एक ई-मेल आला होता त्यातील खुप माहिती खरच इतकी छान होती कि म्हटलं हि माहिती माझ्या ब्लॉगवर टाकलीच पाहिजे.

1.. Coca-Cola was originally green.

2. The most common name in the world is Mohammed.

3. The name of all the continents end with the same letter that they
start with.

4. There are two credit cards for every person in the United States.

5. TYPEWRITER is the longest word that can be made using the letters
only on one row ! of the keyboard.

6. Women blink nearly twice as much as men!!

7. You can't kill yourself by holding your breath.

8. It is impossible to lick your elbow.

9. People say "Bless you" when you sneeze because when you sneeze,
your heart stops for a millisecond.

10. It is physically impossible for pigs to look up into the sky.

11. The "sixth sick sheik's sixth sheep's sick" is said to be the
toughest tongue twister in the English language.

12. If you sneeze too hard, you can fracture a rib. If you try to
suppress a sneeze, you can rupture a blood vessel in your head or neck
and die.

13. Each king in a deck of playing cards represents great king from
history. Spades - King David Clubs - Alexander the Great, Hearts -
Charlemagne Diamonds - Julius Caesar.

14. 111,111,111 x 111,111,111 = 12,345,678,987,654,321

15. If a statue of a person in the park on a horse has both front legs
in the air, the person died in battle.

16. If the horse has one front leg in the air, the person died as a
result of wounds received in battle.

17. If the horse has all four legs on the ground, the person died of
natural causes.

18. Question - This is the only food that doesn't spoil. What is this?
Ans. - Honey

19. A crocodile cannot stick its tongue out.

20. A snail can sleep for three years.

21. All polar bears are left handed.

22. American Airlines saved $40,000 in 1987 by eliminating one olive
from each salad served in first-class.

23. Butterflies taste with their feet.

24. Elephants are the only animals that can't jump.

25. In the last 4000 years, no new animals have been domesticated.

26. On average, people fear spiders more than they do death.

27.Shakespeare invented the word 'assassination' and 'bump'.

28. Stewardesses is the longest word typed with only the left hand.

29.The ant always falls over on its right side when intoxicated.

30. The electric chair was invented by a dentist.

31.The human heart creates enough pressure when it pumps out to the
body to squirt blood 30 feet.

32. Rats multiply so quickly that in 18 months, two rats could have
over million descendants.

33. Wearing headphones for just an hour will increase the bacteria in
your ear by 700 times.

34. The cigarette lighter was invented before the match.

35. Most lipstick contains fish scales.

36. Like fingerprints, everyone's tongue print is different.

37. And finally 99% of people who read this will try to lick their
elbow.

शनिवार, ८ मे, २०१०

जातीनिहाय जनगणना

जातीनिहाय जनगणना करावी, या मागणीला संसदेने मान्यता दिली आहे. संसदेच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

या गोष्टीचे काहि फायदे जरुर आहेत. जसे की -

१. प्रत्येक जातीप्रमाणे लोकसंख्या कळुन येइल.
२. लोकसंख्येच्या प्रमाणात निर्माण केलेल्या महामंडळांमार्फत आवश्यक तीतक्याच अनुदानाचे योग्य वाटप करता येईल.
३. आज प्रत्येक जातीचा नेता आपाल्या जातीची लोकसंख्या फुगवुन सांगत आहे त्याला खुपच मोठ्या प्रमाणात खीळ बसेल.
४. आरक्षणामधे योग्य टक्केवारी ठेवता येइल.

पण जनगणना चालु झाल्यावर असे नविन नियम लागु करणे बरोबर नव्हते. हा निर्णय आधीच घ्यायचा होता.

उद्या जर एखाद्या जातीची लोकसंख्या कमी भरली तर त्याच्या आरक्षणातील टक्केवारीचे काय?

सर्वात म्हत्वाचे म्हणजे जो डेटा सरकार गोळा करणार आहे तो किती खरा असेल? एखाद्याने फायद्यासाठी इतर मागासवर्गीय आहोत असे सांगीतले तर काय करणार?

स्वतः श्री. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, "आता पुन्हा जनगणना करणार्‍या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे लागेल" आता हा खर्च आपल्याच खिशातुन जाणार आहे.

पण जर वर मांडलेले सकारात्मक मुद्दे प्रत्यक्षात अवतरले तर वेळेचा आणि पैश्याचा अपव्यय कारणी लागला असे म्हणता येईल.

गुरुवार, २९ एप्रिल, २०१०

माझी आवडती पुस्तके - भाग २

मोनालिसा

लास्ट सपर


द दा विंची कोड

माझ्या आवडत्या लेखकांमधे डॅन ब्राऊन यांचे नाव खुप वर आहे. त्यांनी आज पर्यंत डिजीटल फोर्टेस, एंजल्स अ‍ॅंड डेमन्स, डिसेपश्न पॉइंट, द दा विंची कोड, लॉस्ट सिम्बॉल इतकीच मोजकी पुस्तके लिहिल आहेत. त्यांचे नाव गाजले ते द दा विंची कोड या पुस्तकामुळे.

द दा विंची कोड या पुस्तकाच्या आज पर्यंत ८० लाख कॉपीज जगभर विकल्या गेल्या आहेत. मराठी मधे सुद्दा मेहता पब्लिकेशनने हे पुस्तक छापले आहे.

या पुस्तकाची सुरवात होते ती पॅरिस मधील लुव्हर संग्रहालायाच्या व्यवस्थापकाच्या खुनामुळे. व्यवस्थापकाने मरताना स्वताच्या अंगाभोवती आणि अंगावर अशी काही चिन्हे काढली असतात की त्याचे विश्लेषण करण्यासाठी हॉवर्ड मधील प्रसिद्द चिन्हेतज्ञ रॉबर्ट लँगड्न यांना बोलावले जाते आणि मजेची गोष्ट अशी की तपास अधिकारी बेझु पाश याच्या नजरेत स्वतः लँगड्न हाच खुनी असतो.

पॅरिस पोलीस खात्यामधील गुप्तलिपीतज्ञ सोफिया नेव्हुच्या साथीने लँगड्न विविध चिन्हांमधुन खुन्याचा माग काढायला सुरवात करतो तेव्हा त्यांना लिओनार्दो विंचीच्या मोनालिसा, लास्ट सपर या चित्रांमधील तसचं चर्चने लपवुन ठेवलेले होली ग्रेलचे गुपिते उघड होवु लागतात.

खुन झालेला व्यवस्थापक दुसरा तिसरा कोणी नसुन प्रायरी ऑफ सायन्स या गुप्त पंथाचा मास्टर असतो. तो पंथ ज्याचे मेंबर सर आईझ्याक न्युटन, व्हिकटर ह्युगो, विंची सारखे नावाजलेले लोक असतात. काय होता हा पंथ? कशासाठी कार्यरत होता? असे कोणते रहस्य होते ज्यासाठी व्यवस्थापकाला स्वताचा जीव गमवावा लागला? १३ आकडा अशुभ का मानला जातो? फिबोनाची सिरिज काय आहे? हि रहस्य उघडण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे.

मंगळवार, २६ जानेवारी, २०१०

महाराष्ट्रा पुढच्या समस्या

आज भारत प्रजासत्ताक होवुन ६० वर्ष झाली आहेत आणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होवुन ५० वर्ष होत आली आहेत. तरीही ज्या समस्या राज्य निर्मीतीच्या वेळेला होत्या त्याच समस्या कमी अधिक प्रमाणात आज हि तश्याच आहेत. त्याच समस्यांबद्दल मला आज माझे मत मांडायचे आहे.

१. भ्रष्टाचार -

२२०० वर्षा पुर्वी आर्य चाणक्य यांनी त्यांच्या कोटिल्य अर्थशास्त्रामधे लिहिले आहे, "ज्या प्रकारे तळ्यातील मासे पाणी कधी पितात ते कळत नाही त्याच प्रकारे सरकारी अधिकारी पैसे कधी खातात ते कळत नाही". आज २२०० वर्षा नंतर ही वाक्य जसेच्या तसे लागु पडतं. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे.

सरकारी अधिकारी त्यांच्या पगाराला हात तरी लावत असतील का? इतके पैसे ते भ्रष्टाचारातुन कमवत आहेत. पण या अधिकारांन्या पैसे कोण देतं तर आपण सामान्य माणुसच न. आपल्यालाच आपली कामे नियमबाह्य प्रकारे, तातडीने करुन घेयाची असतात त्यामुळे या अधिकारांच्या हात 'ओले' करायला मागे पुढे पाहत नाही. जर देणारा देत आहे तर घेणारा मागे का राहिल?

आपण जपानचे कॉतुक करतो कारण तिथला वेटर टिप घेत नाही म्हणुन, किती देशाचा अभिमान बाळगतात ते लोक वैगरे पण आपल्या देशात आल्या बरोबर आपण काय करतो. हल्ली तर केस कापणार्‍याला पण टिप द्यावी लागते. सुरवात हिथुनच होत आहे. आज ज्याचे वय ३-४ वर्ष आहे तो जर बघेल की त्याचे वडिल केस कापणार्‍याला टिप देत आहेत, रस्त्यावर सिग्नल तोडला म्हणुन पोलीस हवालदाराला टिप देत आहेत तर त्याच्या कडुन मोठा झाल्यावर काय अपेक्षा ठेवणार. रस्त्यावरच्या हवालदाराला टिप देण्यापेक्षा आपणच जर वाहतुकीचे नियम पाळले तर. परदेशात आपण बरोबर लाइन न कापता वाहन चालवणार पण इथे आल्यावर लाइन तोडायची स्पर्धा लावणार याला काय म्हणायचे. जर आपणच दुसर्यांना पैसे खाण्याची संधी निर्माण करत असु तर ते का नाही खाणार.

२. शिक्षण -

राज्याचे शैक्षणीक धोरण काय तर शिक्षणमंत्र्याची मर्जी. शिक्षणमंत्री बदला की धोरण बदले. आज काय ४ थी पर्यंत परीक्षा नाहीत, उद्या १ ली पासुन म्रराठी सक्तीची अगदीच काही नाही मिळाले तर घाला ११ वीच्या प्रवेशाचे गोंधळ. हे असे शैक्षणीक धोरण असु शकतं का?

लहान मुलाला ज्युनियर केजी मधे प्रवेशासाठी काय काय उपद्वयाप करायला लागतात ते ऐकली की मन अगदी सुन्न होवुन जाते. २-३ वर्षाच्या मुलाल काय काय भयानक प्रश्न विचारले जातात? त्याच्या आई वडिलांची टेस्ट घेतली जाते, त्यांचे शिक्षण पाहीले जाते. जर आई वडिलांच्या शिक्षणावर मुलांची अ‍ॅडमिशन ठरणार असतील तर ज्यांचे गरिबीमुळे किंवा इतर कारणामुळे शिक्षण होवु शकले नाही त्यांच्या मुलांनी काय करायचे?

९० च्या दशकामधे ११ वीच्या प्रवेशासाठी केंद्रिय बोर्डाच्या मुलांना ५% वाढवुन मिळायचे का तर त्यांचा अभ्यासक्रम असा होता की ते राज्याच्या शालेय बोर्डापेक्षा कठिण होता त्यामुळे त्यांना हे ग्रेस मार्क मिळायचे. आज बघा काय चालु आहे ते शालेय बोर्डाच्या मुलांवर ग्रेस मार्क घेयाची वेळ आली आहे. गेल्या १०-१५ वर्षा मधे जो आमुलाग्र बदल केंद्रिय पातळीवर होवु शकले ते बदल पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्रमधे का नाही होवु शकले? मान्य आहे की जी सुविधा मुंबई, पुण्याच्या मुलाला मिळते ती सुविधा राज्याच्या ग्रामीण भागात नाही मिळु शकत पण त्या साठी पुढचे १०० वर्ष जो अभ्यासक्रम आजोबांनी शिकला तोच नातु पण शिकणार का? आज १०वीत असलेल्या मुलाला आपल्याला कोणत्या नियामानुसार प्रवेश मिळणार आहे ते त्याला माहित नाही. किती मार्कस मिळवायचे हे त्याला उमगत नाही आहे याला जबाबदार कोण?

डिम्ड विद्यापिठ म्हणजे राजकारणी लोकाचे पैसे खाण्याचे हक्कच्या ठिकाणांन पैकी एक. हि सर्व विद्यापिठ या राजकारणी लोंकांच्या हातात एकटवली आहेत. मागच्या आठवड्यात केंद्रीय पातळीवर निर्णय झाला की या विद्यापिठांची मान्यता रद्द करायची. चांगला निर्णय आहे (सुप्रिम कॉर्टाने नेहमी प्रमाणे त्याला स्थगीती दिली आहे तो भाग वेगळा. मला एक गोष्ट कधिच कळत नाही या सुप्रिम कॉर्टामधे इतकी अपिल पडुन असतात त्यांचा कधि निकाल लागत नाही पण संजय दत्तला जामीन, विद्यापिठांची स्थगीती यांचे निर्णय कसे लवकर लागतात असो) पण जर सरकारला जर या विद्यापिठांची मान्यता रद्द करयाची होती तर याच सरकार मधिल अर्जुन सिंग यांनी ती दिली कशाला? सरकारला माहीत नव्हते का कि कुराण कोणाची आहेत? काल ज्यांची होती त्यांचीच ती आज हि आहेत मग हा निर्णय का झाला? याचे गोडबंगाल काय आहे?

३. उर्जा -

महाराष्ट्रामधील सर्वात मोठा विनोद काय असेल तर वीज. नरेंद्र दाभोळकरांनी खरेतर लोडशेडिंगचे अचुक वेळापत्रक सांगणार्‍याला ज्योतीष म्हणुन घोषित करावे असे माझे मत आहे. सरकारचे वेळापत्रक आणि खरी लोडशेडिंगची वेळ यात साम्य कुठेच नाही आहे. पण लोडशेडिंगची वेळ आली आहे सरकारच्या धरसोड वृती मुळे आणी योग्य नियोजनचा अभाव. सरकार कडे नक्की किती वीजेची गरज आहे याची आकडेवारी आहे पण ती उपलब्ध कशी करायची याचे नियोजनच नाही आहे. माझे ठाम मत आहे की हि लोडशेडिंग सरकारने या इनव्हर्टर बनवणार्‍या कंपनीच्या फायद्यासाठी केली आहे. १८-१८ तास वीज नसुन सुद्दा वीजेचे बिल तितकेच कसे येवु शकते.

२००७ मधे उर्जामंत्री दिलिप वळसे पाटील म्हणत होते की २००९ पर्यंत महाराष्ट्रा लोडशेडिंग मुक्त करणार, २००९ मधे तेच मंत्री म्हणतात की २०१२ पर्यंत करणार. याच वरुन समजुन जायाचे की सरकार वेळ काढत आहे. बरे सरकार कडे इच्छाशक्ती तरी आहे का? तर ते ही नाही. कारण २०१२ पर्यंत जरी लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र करायचा म्हट्ला तर आज वीजनिर्मितीची प्रक्रिया सुरु झाली पाहीजे होती. ते तर कुठेच दिसत नाही आहे.

दाभोळ वीज प्रकल्पाचे तीन तेरा या राजकारणी लोकांनी कसे वाजवले ते तर सर्वांच माहीत आहे. स्वताचा हिस्सा नाही मिळाला म्हणुन युती शासनाने त्याला अरबी समुद्रामधे बुडवला आणी नंतर तुकारामांच्या गाथा निघाल्या तश्या या प्रकल्पाला समुद्रामधुन बाहेर काढला. पण यात नुकसान कोणाचे झाले. राज्याचेच न. त्या दिवसापासुन आज पर्यंत या राज्यामधे किती विदेशी प्रकल्प आले. एक ही नाही. कारण जो घोळ आपण दाभोळ वीज प्रकल्पामधे घातला त्याचा एक वाईट मेसेज गेला की महाराष्ट्र हे गुंतवणी करण्या योग्य राज्य नाही आहे.

४. से़झ -

रायगड मधील लोकांना सेझ नको असताना ही सेझ राबवण्यात येत आहे. सरकार नक्की कोणाचे आहे. जनतेचे की अंबानीचे? एक छोटसं उदाहरण सांगतो त्या वरुन समजुन येइल सरकार कोणाचे आहे ते.

मागच्या वर्षी न्हावा शेवा लिंक जोडण्यासाठी टेंडर मागवले होते. यात इतर टेडंर बरोबर अनिल अंबानीचे कोरियन कंपनी बरोबर आणि मुकेश अंबानीचे ही टेंडर होते. हि लिंक मुळे जो पट्टा जोडला जाणार होता तो आहे मुकेश अंबानीच्या सेझचा. थोडक्यात काय या लिंक वरुन सर्वात जास्त मुकेश अंबानीच्या मालाच्या गाडयांची ये जा होणार होती.

ही लिंक नेहमीप्रमाणे बांधा, वापरा, ह्स्तांतर करा या तत्त्वावर बांधण्यात येत होती. अनिल अंबानीने टेंडर भरताना दाखवले होते की या लिंकचा खर्च ते ७ वर्षा मधे टोल वसुल करुन पुरा करतील. तर तेच मुकेशने दाखवले की खर्च वसुल करण्यासाठी (टोल लावुन) त्यांना ७५ वर्ष लागतील. इतीक मोठी तफावत होती या दोन टेंडर मधे. हे कसे काय शक्य तर, अनिल अंबानी स्वताची दुश्मनी काढण्यासाठी इतका भरमसाठ टोल आकरणार होता की त्यांचा खर्च ७ वर्षामधे भरुन निघाला असता. अगदी याच्या उलटे मुकेश करणार होते. जेनेकरुन मालाची किमंत कमी होवुन त्यांच्या मालाल बाजारात उठाव मिळेल. शेवटी काय झाले तर अनिल अंबानींचे टेडर पास होवुन सुद्दा अश्या काही चाव्या फिरल्याकी सरकारने अनिल अंबानींचे टेडर रद्द करुन स्वताच तो प्रकल्प हातात घेतला आहे. या वरुन काय ते समजा.

मुकेश अंबानी म्हणे योग्य भाव देवुन जमीनी खरेदी करत आहेत. पण जो शेतकरी काळ्या मातीला आई समजतो तो शेतकरी जमीन विकायला तयार नाही आहे तरी हे सरकारी अधिकारी धाकटपाशा दाखवुन ती जमीन लुबाडत आहे. हा सेझ प्रकल्प घरटी एकाला नोकरी देणार आहे. अरे पण घरात २-३ भाउ असतील आणि एकालाच नोकरी दिली तर इतर भावांनी काय करायचे. शेती करुन जे सर्वांचे भागत होते ते सुद्दा सरकारी आशिर्वादाने खेचुन घेतले जात आहे. जो याला विरोध करेल त्याच्या वर पोलिस नको नको ती कलमे लावुन जेल मधे पाठवत आहेत.

आता हे प्रकरण सुप्रिम कॉर्टापुढे गेले आहे. बघु काय होते ते.

५. शेतकरी आत्महत्या -

महाराष्ट्रामधील सर्वात ज्वलंत समस्या कोणती असेल तर ती हिच आहे. निर्सगापासुन सावकरांन पर्यंत प्रत्येक जण शेतकरील्या आत्महत्येचा वाटेवर ढकलत आहे. आधिच्या पिकाला घेतलेले कर्ज कसे फेडायचे याच्या विंवचनेत असताना दुसर्या लागवडी साठी पैसे कोठुन आणायचे हि समस्या उभी राहते. (स्वताच्याच पक्षातील) सावकारांना कोपरा पासुन ढोपरा पर्यंत सोलायची भाषा बोलणारे आबा शेतकर्यांना स्वस्ता मधे आणी सुलभ प्रकारे कर्ज कसे उभे राहील हे बघत नाहीत.

शेतमाला चांगला भाव मिळत नाही. किती भाव मिळेल याची भविष्यवाणी न करता शरद पवार आज कोणाचे भाव वाढणार उद्या कोणाचे भाव वाढणार याची भविष्यवाणी करत आहेत. (आज पर्यंत साखरेचे आणि दुधाचे भाव वाढले आणी हे दोन पिक राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जातात तो पश्चिम महाराष्ट्राच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हे कसे काय बुवा)

आज उसाला चांगला भाव मिळाला तर जास्तीत जास्त शेतकरी पुढच्या वर्षी त्याचेच पिक घेतात हे काय सरकारला माहीत नाही आहे का? मग सरकार त्या मालाला आधिच रास्त भाव का नाही देत. शेतमालाची किंमत तर ठरवायाची पण खरेदी चालु करयाची २-३ महिन्यानंतर हि चापलुसी कशासाठी.

६. लोंढे -

इतर राज्य स्वताच्या मुख्यमंत्रांचे पुतळे उभे करत बसणार आणि महाराष्ट्र त्यांच्या लोकाना पोसत बसणार. राज्यघटने मधे काही लिहिले असो पण एका घरात कोणी किती राहायचे याला मर्यादा आहे की नाही. मुलभुत सोयिसुविधांवर ताण पडत आहे. पण सरकारला मतांशिवाय काहीच दिसत नाही आहे.

समस्या तर खुप आहेत. या समस्यांवर उत्तर सुद्दा आहेत. पण समस्या सोडवण्यासाठी लागणारा खंबीरपणा या राज्यकरत्यांमधे नाही आहे तो कोठुन आणायचा?

रविवार, २४ जानेवारी, २०१०

महाराष्ट्राच्या मानबिंदुची अवस्था

काही दिवसांपुर्वी पुण्यनगरीला जाण्याचा योग आला. मित्र परिवारांना कचकचुन भेटता आल्यामुळे खुपच आनंद झाला होता. चितळ्यांची भाकरवडी, मनाली मधे जेवण यांनी पोट अगदी तृप्त झाले होते.

पण

या सर्वांनवर विरजण पडले ते महाराष्ट्राच्या मानबिंदुची म्हणजे शनिवारवाडयाची अवस्था बघुन. मन अगदी हेलावुन गेले. असे वाटत होते की आताच शनिवारवाड्यातुन बाहेर पडावे आणि ज्यांनी त्याची मानखंडना केली आहे त्यांचे डोके मेखसुन मारुन फोडावे.

ज्या शनिवारवाड्यात देशाचे राजकारण ठरायचे त्याची काय हि भयाण अवस्था? पानीपतचे स्वार ज्या दरवाजामधुन बाहेर पडले त्या दरवाजा मधुन आज वासनेचे प्रेमवीर आत घुसतात. ५-५ रुपयाची तिकिटे घेवुन आपण काय बघतो तर वासनेमधे आकंठ बुडालेल्या प्रेमविरांचे चाळे जे आपल्याला दिसतात पण ना शनिवारवाड्याच्या रखवालदारांना दिसत नाहीत ना स्वयंघोषीत संस्कृती रक्षाकांना.

आपल्या कडे इतिहासची कदरच केली जात नाही. पण त्याच वेळेला आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे जो स्वताचा इतिहास विसरला तो काय इतिहास घडवणार.

१९ व्या शतकात इंग्रजांनी शनिवारवाड्याचे लोकांच्या मनातील असलेले स्थान पुसण्यासाठी शनिवारवाडयाला आग लावुन दिली आणी ती आग चांगली १५ दिवस धुमसत ठेवु दिली. आज जी शनिवारवाड्याची भग्नअवस्था झाली आहे ती त्या आगीमुळे.

पण आपले सरकार सुद्दा काही करत नाही आहे. सरकारने मनात आणले तर तसाच्या तसा शनिवारवाडा उभा राहु शकतो पण सरकारला करायचे नाही आहे. शनिवारवाड्याचा विकास म्हणजे SRA ची योजना नाही ज्यात सरकारला मलिदा मिळेल त्या मुळे सरकार काही करणार नाही.

इतर देशातील जावुदे आपल्याच देशातील जयपुर मधील राजवाडे जसेच्या तसे राहु शकतात तर आपल्या महाराष्ट्रामधील औतिहासिक स्थाने योग्य प्रकारे का नाही राहु शकत. सरकारबरोबर आपली हि जबाबदारी आहे. आपल्या पुर्वजाचा अमुल्य ठेवा जपायची. ती सर्वांनी पार पाडलीच पाहीजे.

इतिहासप्रेमी यात लक्ष घालु शकतील का? माझ्या परिने जितके होवु शकेल तितकी मदत मी करेन. पण शनिवारवाडा वाचवा हो.

(या लेखा मधे फोटो डकवुन मला माझ्या मानबिंदुची अवेहलना करयाची नाही आहे त्यामुळे इथे फोटो देत नाही आहे.)

शनिवार, २३ जानेवारी, २०१०

माझी आवडती पुस्तके - भाग १

वाचाल तर वाचाल असे कोणी तर म्हणुन ठेवलेच आहे. कदाचीत मी माझ्या खुप लहानपणीच हे वाक्य ऐकले असावे म्हणुन लहानपणा पासुन आज पर्यंत मी पुस्तके वाचत सुटलो आहे (अभ्यासाची नव्हे, गोष्टी, कांदबंरी, अनुवादीत, आत्मचरित्र)

कोणाला ललित लेखन आवडतं, तर कोणाला आत्मचरित्र. पण आपणास बुवा अनुवादीत पुस्तके जाम आवडतात. किती वेगवेगळे विषय हाताळलेले असतात या परदेशी लेखकांनी मारीयो पुझोचा गॉडफादर, रॉबीन कुकची मेडिकल वरची पुस्तके, मायकल क्रायटनची विज्ञानाच्या पुढची पुस्तके, डॅन ब्राउनची ख्रिश्चन संस्थाच्या कल्पीत गुपीतांवरची पुस्तके. ही सर्व पुस्तके मला भयंकर आवडतात.

या लेखमालेतुन मला आज याच पुस्तकांन बद्दल बॉल्गायचे आहे.

माझे अतिशय लाडके पुस्तक म्हणजे मारियो पुझोचे' द गॉडफादर.'


माझ्या मते तरी या जगातील सार्वकालीक बेस्ट पुस्तक हेच असु शकतं. हे पुस्तक वाचताना आपण ते वाचत नाही तर आपोआप आपल्या समोर त्या पुस्तकातील व्यक्तीरेखा जिवंत होवुन आपण त्या चित्रपट पाहिल्या सारख्या त्या बघत राहतो.

हे पुस्तक पब्लिश झाल्यानंतर मारियो पुझोवर तो माफियाचा माणुस असल्याचा आरोप झाल होता कारण माफिया जगाचे सखोल वर्णन तोच करु शकतो जो त्यांच्यात राहिला आहे. पण या गोष्टिंचे खंडन करताना मारियोने सांगितले कि त्याच्या आजुबाजुला जे घडत होते त्याचे वर्णन त्याने पुस्ताका मधे केले आहे. या पुस्तकाचा प्रभाव त्या काळातील डॉन लोकांवर ही पड्ला असे बोलले जात होते.


माफिया जग आणि त्यांचे व्यवहार कसे चालतात याचे उत्तम वर्णन खचितच इतर कोणत्या पुस्तका मधे मिळेल. रुढ अर्थाने या पुस्तकाचा नायक आहे गॉडफादर व्हिटो कोर्लीयानेचा तिसरा मुलगा मायकेल कोर्लीयाने. जो त्याच्या फॅमीलीच्या व्यवसायापासुन दुर असतो. पण त्याच्या वडीलांवर म्हणजे गॉडफादर व्हिटो वर प्रतीस्पर्धी हल्ल करतात तेव्हा त्याला त्याच्या कुटुंबासाठी पुढे व्हावेच लागते.

या पुस्तकावर हॉलीवुड मधे १९७१-७२ मधे द गॉडफादर पिक्चर येवुन गेला. मार्लन र्बंडो, अल पचीनोच्या अभिनयाने तो पिक्चर सजला होता. पण एक ल़क्षात ठेवा पुस्तक वाचल्या शिवाय पिक्चर पाहु नका. नाहीतर आधि पिक्चर बघाल आणि मग पुस्तक वाचायला जाल तर भ्रमनिरास होईल.

The Godfather QUOTES :-

1. "I'm gonna make him an offer he can't refuse." - The Godfather Vito

2. So the next day, my father went to see him; only this time with Luca Brasi. An' within an hour, he signed a release, for a certified check for $1000. [Kay: "How'd he do that?"] My father made him an offer he couldn't refuse. [Kay: "What was that?"] Luca Brasi held a gun to his head and my father assured him that either his brains, or his signature, would be on the contract. That's a true story. That's my family, Kay, it's not me."- Michael and Kay conversing

3. Leave the gun. Take the cannoli." -Clemenza to Rocco

4. But I'm a superstitious man. And if some unlucky accident should befall him - If he should get shot in the head by a police officer, or if he should hang himself in his jail cell - or if he's struck by a bolt of lightning, them I'm going to blame some of the people in this room, and that I do not forgive. But, that aside, let me say that I swear, on the souls of my grandchildren, that I will not be the one to break the peace we've made here today." -Don Corleone to the other Dons

(वरिल वाक्य या पुस्ताकामधुन घेतली आहेत)




शनिवार, १६ जानेवारी, २०१०

जगातील खरी आश्वर्य

मानवाने आकाशात झेप घेतली, चंद्रावर पाऊल ठेवले, गुरुवर, सुर्यावर अवकाश यान धाडले या सर्व ग्रह, तार्‍यांबद्दल माहीती मिळावली.
पण
जेव्हा त्याने स्वताच्या भुत़काळात डोकावुन पाहीले तेव्हा त्याच्या चेहरा तोंडात मारल्या सारखा झाला. कारण एकच सुर्य, चंद्रच्या नादात स्वताच्या ग्रहाकडे लक्ष दिलेच नाही. आधुनीक काळातील मानवाला एकच घमेंड आहे ती म्हणजे तो त्याच्या पुर्वांजा पेक्षा अधिक प्रगत आहे. पण मेक्सिको मधील पालेन्क मधील माया लोकांच्या पिरॅमीड मधील अग्नीबाण्, जगातील प्राचीन चित्रांमधील अंतराळवीर, पेरु देशातील एका दगडावर ह्र्दय बदलण्याचे चित्र, सुमेरियन लोकांची १५ आकडी संख्या जी आजच्या कंम्पुटरवर ही दिसत नाही. अश्या बर्‍याच घटना बघुन तो जागीच थिजुन गेला.

खरोखर जे आपल्या पुर्वजांनी लिहुन ठेवले आहे, चित्रकाम करुन ठेवले आहे त्या बद्दल आपल्याला जास्त काहीच माहीती मिळत नाही, नाही कोणी त्याबद्दल बोलत. आंतरजालावर शोधत असताना अश्याच काही गोष्टी मला सापडल्या त्याच गोष्टींबद्दल आज मला ब्लॉगायचे आहे.

१. पिरीरीसचा नकाशा.

१५१३ मधे तुर्कस्तान मधे 'पिरीरीस' नावाचा एक अ‍ॅडमिरील होता. त्याने जगाचा एक नकाशा बनवला. तो नकाशा दोन भागात हरणाच्या कातड्यांवर वेगवेगळ्या रंगानी बनवला आहे. हा नकाशा १९२९ मधे सापडला. पण खुप लोकांना तो नकाशा चुकिचा वाटत होता. तेव्हा श्री. मॅलरी (अमेरीकन तज्ञ) यांनी अमेरीकन आरमाराच्या वॉल्टर्स यांची मदत घेवुन उपग्रहांद्वारे कॅरोच्या खुप उंची वरुन फोटो घेवुन पाहीले तर त्यांना धक्काच बसला. कारण त्या नकाशा मधे दाखवण्यात आलेली खंडाची टोके थोडी खेचल्यासारखी, निमुळती होती आणि कॅरो वरुन घेतलेल्या फोटोशी हा नकाशा तंतोतंत जुळत होता. १५१३ मधे जेव्हा कोलंबसला नुकताच अमेरीकेचा शोध लागला होता त्या काळाच्या नकाशा मधे अमेरीका दाखावली होती. विमानाच्या सहाय्याने बनवला नकाशा १५१३ मधे बनवलेल्या नकाशाशी कसा काय तंतोतंत जुळला? पिरीरीसने हा नकाशा कोणत्या उपकरणांच्या सहाय्याने काढला? आज ही या आणि इतर प्रश्नांची उत्तर कोणी देवु शकले नाही आहेत.

२. नाझका लाईन्स


दक्षिण अमेरीकेतील पेरु देशात अँडीज पर्वतांमधे एका कड्यावर त्रिशुळ खोदला आहे. या त्रिशुळाच्या दिशेने गेलो तर पर्वतावर नाझकाचे पठार आहे. त्या पठारावर मैलोपर्यंत सरळ रेषा आहेत. काही समांतर तर काही एकमेकींना छेद देत आहेत. या रेषांनाच इंकाचे रस्ते ही म्हणतात. कारण इथे पुर्वी इंका जमातीमधील लोक रहात होते. हे रस्ते इतके लांब लचक आहेत कि आकाशातुन पाहीले तर असे वाटते की जणु फार मोठा विमानतळच आहे.

३. बोलिव्हिया मधील सुर्यमंदिर




दक्षिण अमेरीके मधील बोलिव्हिया देशातील टियाहुन्को शहरामधे भग्नावस्थेमधे एक सुर्यमंदिर आहे. त्या मंदिराचे द्वारच ९.८ फुट उंच आणि १३ फुट लांब आहे. आश्वर्याची गोष्ट अशी की हे द्वार १० टनाच्या एकाच दगडामधे कोरले आहे. प्राचीन काळामधे हे कसे शक्य आहे? याच शहरात एक २० टन वजनाची आणि २४ फुट उंच मुर्ती सापडली आहे. या मुर्तीवर असंख्य चिन्हे आणी चित्रे आहेत ज्यांचा आज पर्यंत अर्थ लागला नाही आहे.

४. इस्टर आयलंड


याच शहरामधील पठारावर गेलो तर आपण पाहु शकतो की १०० टन वजनाच्य दगडावर ६० टन वजनाचे दगड रचुन भिंती बनवल्या आहेत. या भिंतींमधेच अनेक दगडी चेहरे कोरुन काढले आहेत. या शहरामधे त्या पुतळ्यांना 'मोई' म्हणतात. हे पुतळे इथे कसे आले? कोणी इतके अजस्त्र पुतळे बनवले याचे उत्तर अजुन सापडायचे आहे.

५. पिरॅमिड

इजिप्त मधील पिरॅमिड सर्वांनाच माहीत आहेत. पण इतके अजस्त्र दगड तिथे कसे आले याचा विचार कोणी केला आहे का? आज संपुर्ण वाळवंट असलेल्या इजिप्त मधे इतके मोठे दगड कसे एका ठिकाणाहुन दुसरी कडे नेले असतील? वाळवंट आजच्या काळातील आहे की प्राचीन काळापासुन आहे? या अजस्त्र दगडामधे रस्ते, भुयार कोणी खोदुन काढले? सुपरिचीत खुफुच्या पिरॅमिडला १००० दशलक्षांनी गुणले तर पृथ्वी आणि सुर्याचे अंतर समजुन येतं. पिरॅमिड बांधण्यासाठी हजारो लोक लागले असतील तर त्यांच्या निवासाची, जेवणाची सोय कशी केली गेली?

६. माया संस्कृती

अतिशय प्रगत मानली गेलेल्या संस्कृती पैकी एक असलेल्या माया संस्कृती बद्दल फारसे काहीच समजु शकले नाही आहे. कारण स्पैनीश लोकांच्या आक्रमणामधे त्यांचे बरेच ग्रंथ नष्ट केले गेले. जे थोडे फार हाताशी आहे त्यात एक त्यांचे कॅलेन्डर, काही चित्रे. या सर्वात इतक्या चिन्हांची आणि खुणांची रेलचेल आहे की प्रत्येक जण स्वताच्य समजुती प्रमाणे अर्थ काढत आहे. मायालोक २० पर्यंत अंकगणिताचा वापर करत होते.

मोहेंजोदाडो आणी हरप्पा संस्कृती बद्दल पण तेच कोणी ही या लोकांच्या चिन्हांचा अर्थ लावु शकले नाहीत. उलट तिथे सापडलेल्या मृत शरीरामधे किरणॉस्तर्ग आढळुन आला आहे. हिरोशिमा आणि नागासाकी वर टाकल्यानंतर जितका किरणोस्तर्ग बाहेर पडला त्याहुन जास्त मोहेंजोदडो मधील मृत शरीरांमधे आढळला आहे. अतिप्राचीन काळात इतका किरणोस्तर्ग आला कोठुन?

७. प्राचीन भारत

पहिल्या अणुबॉम्बचे जनक जे. रोब्रट कोपनहेमर यांना विचारण्यात आले होते की, "जगातील पहिल्या अणुबॉम्बची निर्मीती करुन कसे वाटत आहे?" त्याचे त्यांनी ऊत्तर असे दिले की," जगातील पहिल्या नव्हे तर आधुनीक जगातील पहिल्या अणुबॉम्बची निर्मिती कारण जगातील पहिला अणुबॉम्ब प्राचीन भारता मधे वापरले गेले होते." इतक्या मोठा तज्ञ असे बोलत असेल तर त्या वर नक्कीच विश्वास ठेवायला पाहीजे. हे जर खरे असेल तर आपल्या पुर्वजांना हे ज्ञान कसे मिळाले? महाभारत युद्धा मधे वर्णली गेलेली शस्त्र ही अण्वस्त्रच होती हे आता जवळपास सर्वानाच मान्य आहे. इतके मोठे ज्ञान कोठुन मिळाले?

हाच खरा जागतिक वारसा आहे. जो आपण जपला पाहिजे.